शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:05 IST

बभळाज : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी, नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी

बभळाज : परिसरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली असून मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह १ तास मुसळधार पाऊस कोसळला. येथील श्री नागेश्वर मंदिराच्या परिसरात वीज कोसळल्याची चर्चा आहे. मात्र, कोणतेही नुकसान झालेले नाही.१६ रोजी पूर्ण दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी आंतर मशागतीची कामे उरकून घ्यायला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळीही निरभ्र वातावरण व उन्ह पडल्याने कापसावर फवारणी, निंदणी, अशी कामे सुरु झाली होती. मात्र, दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सगळी कामे बंद करुन शेतकरी परतले. यापुढील तीन चार दिवस कोरड मिळाली तरी शेतात काम करता येणार नाही व वाफसाही मिळणार नाही.पिके झाली खराबज्वारी, बाजरी ही पिके पक्व झाली आहेत तर काही शेतात दाणा भरणीवर आहेत. पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने पिके खराब झाली आहेत तर कापसाची पक्की झालेली बोंडे सडायला लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून ओल्या दुष्काळाची भिती व्यक्त होत आहे. टमाट्याचेही मोठे नुकसान झाले आहे.पंचनाम्याची मागणीखराब झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. मागील तीन वर्षात कमी पावसामुळे अपेक्षित उत्पन्न आले नाही. म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. यावर्षी जास्त पावसामुळे पिके नष्ट होत आहेत. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला जात असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नेते प्रचारात तर प्रशासन तयारीत गुंतले असल्याने शेतकºयांना वाºयावर सोडल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकºयांच्या नुकसानग्रस्त पिकांचा त्वरित पंचनामा करुन विमा कंपनीकडून अथवा शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. हवालदिल झालेल्या शेतकºयाला मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे