शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:05 IST

बभळाज : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी, नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी

बभळाज : परिसरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली असून मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह १ तास मुसळधार पाऊस कोसळला. येथील श्री नागेश्वर मंदिराच्या परिसरात वीज कोसळल्याची चर्चा आहे. मात्र, कोणतेही नुकसान झालेले नाही.१६ रोजी पूर्ण दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी आंतर मशागतीची कामे उरकून घ्यायला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळीही निरभ्र वातावरण व उन्ह पडल्याने कापसावर फवारणी, निंदणी, अशी कामे सुरु झाली होती. मात्र, दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सगळी कामे बंद करुन शेतकरी परतले. यापुढील तीन चार दिवस कोरड मिळाली तरी शेतात काम करता येणार नाही व वाफसाही मिळणार नाही.पिके झाली खराबज्वारी, बाजरी ही पिके पक्व झाली आहेत तर काही शेतात दाणा भरणीवर आहेत. पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने पिके खराब झाली आहेत तर कापसाची पक्की झालेली बोंडे सडायला लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून ओल्या दुष्काळाची भिती व्यक्त होत आहे. टमाट्याचेही मोठे नुकसान झाले आहे.पंचनाम्याची मागणीखराब झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. मागील तीन वर्षात कमी पावसामुळे अपेक्षित उत्पन्न आले नाही. म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. यावर्षी जास्त पावसामुळे पिके नष्ट होत आहेत. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला जात असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नेते प्रचारात तर प्रशासन तयारीत गुंतले असल्याने शेतकºयांना वाºयावर सोडल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकºयांच्या नुकसानग्रस्त पिकांचा त्वरित पंचनामा करुन विमा कंपनीकडून अथवा शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. हवालदिल झालेल्या शेतकºयाला मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे