शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

आगामी पाच वर्षात महाराष्टÑाला दुष्काळमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:30 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांची दोंडाईचा येथे सभा : आता स्पर्धा देशातील राज्यांशी नव्हे तर युरोप राष्टÑांशी करणार

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेनिमित्त झाली सभामुख्यमंत्र्यांनी यात्रेचा उद्देश केला स्पष्ट

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या पाच वर्षात जलसिंचनाची अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. आगामी काळात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्टÑ दुष्काळमुक्त केला जाईल. तसेच अक्कलपाडा, सुलवाडे-जामफळ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्याला यापुढे कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. दरम्यान आगामी काळात महाराष्टÑाला सर्वच क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोंडाईचा येथील जाहीर सभेत केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रेचा दुसरा टप्पा गुरूवारपासून धुळ्यातून सुरूवात झाला. यानंतर दोंडाईचा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा खा. डॉ. सुभाष भामरे, अशोक कांडेलकर, दोंडाईचाच्या नगराध्यक्षा नयनकुमार कुंवर, शिंदखेड्याच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, डॉ. माधुरी बोरसे आदी उपस्थित होते.पाचवर्षात केलेली विकास कामे जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेने मोठ्या विश्वासाने युतीच्या हाती सत्ता सोपविली. या पाच वर्षात अनेक आव्हाने आली. मात्र प्रत्येक आव्हानाकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले. गेल्या पाच वर्षात राज्य उद्योग, रोजगार क्षेत्रात पहिल्याक्रमांकावर आणले. तर आरोग्य आणि शिक्षणाच्याबाबतीत राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आगामी काळात शिक्षण क्षेत्रातही महाराष्टÑ आघाडीवर असेल.दुष्काळ, बोंडअळी यामुळे राज्यातील शेतकरीवर्ग अडचणीत आला. मात्र या अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सिंचनाच्या क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडवून आणले. जिल्ह्यातील सुलवाडे-जामफळ हा महत्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र मोदींनी या प्रकल्पांसाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे आगामी काळात हे प्रकल्प पूर्ण होवून हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. अक्कलपाडा, सुलवाडेच्या माध्यमातून या भागाला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. 

टॅग्स :Dhuleधुळे