शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

महाआघाडीला विधानसभेत जमले, ग्रामपंचायतीत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST

जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र माघारीपर्यंत ३६ ग्रामंचायती बिनविरोध झाल्याने, आता फक्त १८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ...

जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र माघारीपर्यंत ३६ ग्रामंचायती बिनविरोध झाल्याने, आता फक्त १८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

ग्रामपंचायती निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नाही, हे जरी वास्तव असले तरी प्रत्येक्ष पक्षाशी निगडीत असलेले उमेदवारच या निवडणुकीत उतरत असतात.

राज्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. या महाविकास आघाडीला राज्यातील काही निवडणुकांमध्ये चांगले यश मिळालेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही असा प्रयोग राबविला जाईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना होता. मात्र निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असतानाही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीनही पक्षा एकत्र आल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. त्यामुळे मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा दुसऱ्याला होणार नाही ना? अशीही शंका उपस्थित होऊ लागलेली आहे.

आता मतदानाला अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. ग्रामस्थांनी मते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकले, ते निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या गावपातळीच्या निवडणुकीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास. एक नवीन समीकरण जुळून येऊ शकते. मात्र सर्व काही ग्रामीण भागातील स्थितीवर अवलंबून राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकी या पक्षीय पातळीऐवजी स्थानिक पातळीवरच लढविल्या जात असतात. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा निश्चितच फायदा होणार आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी आघाडीचे नेते एकत्र येतील.

- श्याम सनेर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसेनेचे पॅनल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीत भाऊबंदकी, समाजाचा विषय असतो. निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीचा प्रयत्न होऊ शकतो.

- हिलाल माळी,

जिल्हाध्यक्ष, शिवसेना

ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षीय चिन्हावर लढविली जात नाही. मात्र प्रत्येक गावात त्या-त्या पक्षाच्या विचारसणीचे लोक गावात असतात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे सरपंच, उपसरपंच विराजमान कसे होतील यासाठी तीनही पक्षाचे प्रयत्न करतील.

- किरण शिंदे,

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी