शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीला विधानसभेत जमले, ग्रामपंचायतीत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST

जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र माघारीपर्यंत ३६ ग्रामंचायती बिनविरोध झाल्याने, आता फक्त १८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ...

जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र माघारीपर्यंत ३६ ग्रामंचायती बिनविरोध झाल्याने, आता फक्त १८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

ग्रामपंचायती निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नाही, हे जरी वास्तव असले तरी प्रत्येक्ष पक्षाशी निगडीत असलेले उमेदवारच या निवडणुकीत उतरत असतात.

राज्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. या महाविकास आघाडीला राज्यातील काही निवडणुकांमध्ये चांगले यश मिळालेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही असा प्रयोग राबविला जाईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना होता. मात्र निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असतानाही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीनही पक्षा एकत्र आल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. त्यामुळे मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा दुसऱ्याला होणार नाही ना? अशीही शंका उपस्थित होऊ लागलेली आहे.

आता मतदानाला अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. ग्रामस्थांनी मते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकले, ते निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या गावपातळीच्या निवडणुकीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास. एक नवीन समीकरण जुळून येऊ शकते. मात्र सर्व काही ग्रामीण भागातील स्थितीवर अवलंबून राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकी या पक्षीय पातळीऐवजी स्थानिक पातळीवरच लढविल्या जात असतात. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा निश्चितच फायदा होणार आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी आघाडीचे नेते एकत्र येतील.

- श्याम सनेर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त शिवसेनेचे पॅनल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीत भाऊबंदकी, समाजाचा विषय असतो. निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीचा प्रयत्न होऊ शकतो.

- हिलाल माळी,

जिल्हाध्यक्ष, शिवसेना

ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षीय चिन्हावर लढविली जात नाही. मात्र प्रत्येक गावात त्या-त्या पक्षाच्या विचारसणीचे लोक गावात असतात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे सरपंच, उपसरपंच विराजमान कसे होतील यासाठी तीनही पक्षाचे प्रयत्न करतील.

- किरण शिंदे,

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी