शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

माध्यमिकला पूर्णवेळ शिक्षणाधिकारीच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

धुळे : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळणेच कठीण झालेले आहे. नाशिक पाठोपाठ औरंगाबादच्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनीही पदभार सोडल्याने, ...

धुळे : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळणेच कठीण झालेले आहे. नाशिक पाठोपाठ औरंगाबादच्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनीही पदभार सोडल्याने, सध्या माध्यमिकचा कारभार ‘शिक्षणाधिकाऱ्यांविनाच’ सुरू आहे. दरम्यान सध्या शिक्षणाधिकारी कोण? याची कल्पनाही या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाही.

येथील माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांची बदली झाल्यानंतर यांच्या रिक्त झालेल्या जागी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव डॅा. सुभाष बोरसे यांची ३० मे २०१९ रोजी नियुक्तीचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले होते. डाॅ. बोरसे यांनी १ जुलै २०२० रोजी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रूजू झाले होते. पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाल्याने, शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात आले होते. मात्र अवघ्या एका वर्षातच डाॅ. बोरसे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी पदोन्नती झाली. जिल्हा परिषदेने त्यांना १६ डिसेंबर २०२० रोजी कार्यमुक्त केले. त्यानंतर निरंतर शिक्षण मंडळाच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिकचे शिक्षणाधिकाऱ्यांकडे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला.

त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही.डी. झनकर यांच्याकडे धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. नाशिकसह धुळ्याचाही प्रभारी पदभार सांभाळतांना त्यांना कसरत करावी लागली. मात्र कौटुंबिक कारणास्तव त्यांनीही प्रभारी पदाचा पदभार सोडला. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी औरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडे धुळे माध्यमिकचा पदभार सोपविला. चव्हाण यांनी ८ जून २१ रोजी पदभार स्वीकारला. रुजू झाल्यानंतर ते एक-दोन वेळेसच धुळ्यात आले. मात्र चव्हाण यांच्याकडे औरंगाबादचा प्राथमिक विभागाचाही पदभार सोपविण्यात आल्याने, त्यांनी धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार गेल्या काही दिवसांपासून सोडल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून धुळ्याचा माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी विनाच आहे. तूर्ततरी माध्यमिकचा पदभार कोणाकडेही सोपविण्यात आलेला नाही. गेल्या सात महिन्यात चार प्रभारी शिक्षणाधिकारी बदलण्यात आल्याने, आता नव्याने कोणाकडे पदभार सोपविला जातो, याची उत्सुकता लागून आहे.

विविध कामांचा होतोय खोळंबा

शिक्षणाधिकारी नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होऊ लागला आहे. आता राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे नामांकन ३० जुलैपर्यंत सादर करायचे आहे. त्यासाठी प्रस्तावांची पडताळणी, संबंधित शिक्षकांच्या मुलाखती आदींसाठी शिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदानाचे प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावे लागतात. मात्र तत्पूर्वी शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत त्या प्रस्तावाची पडताळणी करावी लागते. गोपनीय अहवाल असतो, असे अनेक कामे आहेत. मात्र शिक्षणाधिकारीच नसल्याने, ही सर्व कामे प्रलंबित पडलेली आहे.