शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गावे बदलताना पाहून  आनंद व समाधान, धुळ्यात अमीर खानचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:01 IST

पत्रकार परिषद : लामकानी गावात केले श्रमदान

ठळक मुद्देसिने अभिनेते अमीर खान यांनी केले लामकानीत श्रमदानधुळ्यात साधला पत्रकार परिषदेतून संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वॉटरकप स्पर्धेमुळे गावांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी गावांमध्ये पाणलोटांचे मोठे काम उभे राहत असून त्यामुळे या गावांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे. गावोगावी या स्पर्धेतील लोकांचा मोठा सहभाग व त्यामुळे होणारे काम पाहून गावे बदलत असल्याची खात्री पटते. त्यामुळे आनंद व समाधानही मिळते, असे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमिर खान याने येथील पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच्यासोबत त्याची पत्नी किरण राव याही होत्या. दरम्यान, धुळे तालुक्यातील लामकानी गावात सिने अभिनेते अमीर खान यांनी श्रमदान केले़ही अशी स्पर्धा आहे की ज्यात कोणीही हरत नाही. बक्षिस नाही मिळाले तरी त्या गावाने केलेल्या कामामुळे तेथील पाणी समस्या मिटलेली असते. गावांच्या समस्यांचे उत्तर गावांमध्येच आहे. ग्रामस्थांनी ठरविले तर काहीही कठीण नाही, याचा प्रत्यय या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहे. बदल ही निरंतर प्रक्रिया असून गावांमध्ये हा बदल दिसत आहे. घरातील एखादी आपण स्वत: तयार केलेली वस्तू नादुरूस्त होते, तेव्हा नेमके काय झाले आहे, हे आपणास बरोबर समजते. त्याप्रमाणे गावांचे पाणलोटांचे आहे. लोक स्वत: हे काम करत असल्याने त्यातील काय योग्य, काय चूक हे त्यांना बरोबर समजेल, असेही त्याने स्पष्ट केले. स्पर्धेत सहभागी गावांनी जल साठवण क्षमता वाढवली आहेच; पण या मुळे गावांमध्ये जे ‘मनसंधारण’ झाले आहे ते अमूल्य आहे. सर्व जाती-धर्म व राजकीय विचारांचे लोक गावाकरीता एकत्र येऊन काम करत आहेत, ही मोठी गोष्ट असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.  

टॅग्स :Dhuleधुळे