शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

पक्षप्रवेशासाठी आता नेत्यांना ‘फिल्टर पॉलिसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 13:10 IST

मुख्यमंत्री : धुळे येथे पत्रपरिषदेतील माहिती 

धुळे : भाजपत इतर पक्षांमधून मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांसाठी अद्याप प्रवेशासाठी मोकळीक आहे; परंतु आता नेते जास्त व आमच्या जागा कमी आहेत. त्यामुळे नेत्यांसाठी आता ‘फिल्टर पॉलिसी’ अवलंबली जाणार असून स्कॅनिंगनंतरच यापुढे त्यांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्यास गुरूवारी धुळे येथून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी धुळ्यात रोड शो, संध्याकाळी दोंडाईचा तर रात्री नंदुरबार येथे जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री येथे मुक्कामी होते. दुसºया दिवशी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी  पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्हे झाले. त्याचवेळीराज्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाल्याने यात्रा स्थगित केली. मात्र पूरस्थिती निवळली असून यात्रेचा दुसरा टप्पा धुळ्यातून सुरू केला. आतापर्यंत जवळपास ४३ मतदारसंघात पोहचलो असून या टप्प्यात उत्तर महाराष्टÑ, मराठवाडा व विदर्भातील राहिलेला एक जिल्हा करून सोलापूरला दुसरा टप्पा संपेल.  तर तिसरा व अंतिम टप्पा १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत प.महाराष्टÑ ते कोकण (उर्वरीत भाग) असा राहील, असे ते म्हणाले. आमच्यासोबत इतर पक्षांमध्येही यात्रेचा उत्साह संचारला असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे ते उपरोधाने म्हणाले. यात्रेची परंपरा भाजपची असून विरोधात असताना संघर्षाची तर सत्तेत असताना संवादाची ही यात्रा आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समस्या व अपेक्षाही असून त्या हे सरकारच पूर्ण करू शकते, असा विश्वास असल्यानेच यात्रेला हा प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे जबाबदारीही वाढली असून पुन्हा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आणून गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काम करू, असे त्यांनी सांगितले. यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथे काय केले हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. आम्ही सत्तेवर येण्याआधी इतर राज्ये विकासात पुढ होती. मात्र युती शासन आल्यानंतर आज कोणत्याही क्षेत्रात राज्याचा पहिल्या तीनमध्ये क्रमांक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यासह खान्देशातील प्रकल्पांना चालना दिली असून योग्य वेळेत ते पूर्ण होतील. त्यामुळे दुष्काळ व सिंंचनाच्या समस्या दूर होतील. त्यात त्यांनी धुळ्यासाठी अक्कलपाडा पाणी योजना, सुलवाडे-जामफळ योजना व मेगा रिचार्ज प्रकल्पाचा उल्लेख केला. कनेक्टिव्हीटीअभावी धुळे जिल्ह्याचा विकास व प्रगती थांबलेली होती, तिला मनमाड-इंदूर रेल्वे  मार्गामुळे कनेक्टिव्हीटी मिळणार असून प्रगतीला चालना मिळेल, असा आशावादही  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. धुळे महापालिकेला येत्या १५ दिवसांत चांगले व ‘टिकावू’ आयुक्त मिळतील, तसेच महापुरामुळे अतिक्रमण व अवरोधांचे आॅडिट करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी अन्य प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.  जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, सुजितसिंग ठाकूर आदी यावेळी  उपस्थित होते. +

टॅग्स :Dhuleधुळे