शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला कोर्टातून न्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी वरदायी ठरणाऱ्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाबाबत २०११ मध्ये इंदूरच्या उच्च न्यायालयात मनमाड इंदूर रेल्वे मार्ग ...

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी वरदायी ठरणाऱ्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाबाबत २०११ मध्ये इंदूरच्या उच्च न्यायालयात मनमाड इंदूर रेल्वे मार्ग संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी एक याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवरील कामकाज काेरोना महामारीमुळे थांबलेले हाेते. यावर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली असून रेल्वे मार्गातील अडसरबाबत न्यायालयाने संबंधित विभागाला विचारणा केली आहे. त्यात दोन आठवड्यात म्हणणे मांडण्याची सूचना केलेली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना याचिकाकर्तेंचे वकील ॲड. हेमलता गुप्ता यांनी सांगितले, न्यायालयाने सदर प्रकरणात पुढे कामकाज सुरु ठेवायचे की नाही याबाबत दोन आठवड्यात सरकारकडून खुलासा मागितला आहे. पुढील सुनावणी १ सप्टेंबरला करणार आहे.

याचिकाकर्ते मराठे यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षापूर्वी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले असून मार्गाचा अंतिम सर्व्हे देखील पूर्ण झालेला आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी पोर्ट ॲण्ड रेल्वे कार्पोरेशनची स्थापना करण्यात आली आहे. ज्याद्वारे मध्य प्रदेश, महाराष्ट्र सरकार आणि जल परिवहन विभाग यांच्यात एक करार झालेला आहे. या करारांतर्गत रेल्वे मार्गासाठी लागणारा ५५ टक्के खर्च जहाज मंत्रालय करेल. १५ टक्के खर्च महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार करेल. अशा प्रकारे हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा करार झालेला आहे. यात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने निधी देण्यास मंजुरी दिली आहे. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप निधीची मंजुरी मिळालेली नसल्याने हा रेल्वे मार्ग लाल फितीत अडकला आहे.

रेल्वे मार्ग संघर्ष समितीने जेव्हा यासाठी माहितीच्या अधिकारात सरकारकडे माहिती मागितली असता रेल्वे ॲण्ड पोर्ट काॅर्पोरेशनने केंद्राकडून अद्याप निधीची मंजुरी मिळाली नसल्याची माहिती दिली. निधी मिळाल्याशिवाय टेंडर प्रक्रिया पुढे सरकणार नाही, असेही सांगण्यात आले.

यासंदर्भात माहिती देताना मराठे यांनी सांगितले, उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीत आमचे वकील टी. एन. सिंह आणि हेमलता गुप्ता यांच्या माध्यमातून न्यायाधीश सुडोल पोल आणि अनिल वर्मा यांच्या समक्ष ही सर्व माहिती मांडली जाणार आहे. या खटल्याविषयी मध्यप्रदेशातील राज्यसभा सदस्य सुमेरसिंह यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना देखील अवगत करण्यात आले आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील संजीवनी ठरणाऱ्या या रेल्वे मार्गाविषयी खासदार डाॅ. सुमेरसिंह यांनी देखील जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या रेल्वे मार्गाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मनमाड इंदूर रेल्वे मार्ग गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. खान्देशसाठी वरदायी ठरणारा हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी आम्हाला आशा आहे. न्यायालयाच्या माध्यमातून हा रेल्वे मार्ग साकारला जाईल. ज्याचा थेट फायदा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विशेषत: खान्देशातील जनतेला होईल.

- मनोज मराठे

रेल्वेमार्ग संघर्ष समिती प्रमुख.