शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सराईत गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करा, विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 20:20 IST

सराईत गुन्हेगारांची दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या जिवीताला धोका होणार नाही

धुळे :

सराईत गुन्हेगारांची दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या जिवीताला धोका होणार नाही यासाठी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत घडणाऱ्या विविध गुन्ह्यांचा निपटारा तातडीने करण्याचेही सांगितले असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाशिक विभागातंर्गत जिल्हानिहाय वार्षिक तपासणी करण्यासाठी शेखर पाटील धुळ्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते.बी. जी. शेखर पाटील म्हणाले, जिल्ह्याची वार्षिक तपासणी केलेली आहे. त्यात काही सुचना करण्यात आलेल्या आहेत. गुन्ह्यांचा तातडीने निपटारा कसा होईल याकडे अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. निजामपूर, साक्री, शिरपूर, आझादनगर आणि चाळीसगाव रोड पाेलिस ठाण्यात भेट दिली. संवेदनशील भागात देखील भेट देऊन आढावा घेतलेला आहे. ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत त्या ठिकाणी काय उपाय करत येईल याकडे लक्ष दिले जाईल. महिला आणि मुली यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने त्याकडेही लक्ष दिले जाईल. गुन्ह्यांचा तातडीने निपटारा झाला पाहीजे याबाबत देखील सुचना करण्यात आलेल्या आहेत. जनता आणि पोलिस यांचा संवाद मोठ्या प्रमाणावर कसा होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे. ई-टपाल सेवा सुरु करत असल्याने त्याचे प्रात्याक्षिक घेण्यात आले आहे. ही सुविधा ऑनलाईन असल्याने अर्जाबाबत संपुर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. गांजा, भांग याचे समुळ नष्ट करण्याकडेही आमचा भर असेल.