शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सोळा लाख संशयितांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 13:24 IST

कोरोना विषाणूवर अद्याप कोणत्या प्रकारची लस उपलब्ध झालेली नाही़

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना विषाणूवर अद्याप कोणत्या प्रकारची लस उपलब्ध झालेली नाही़ त्यामुळे प्रत्येकांने आपला व आपल्या परिवाराचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे़ जिल्हा आरोग्य विभागांतर्गत प्रत्येक गावोगावी आशा सेविकांमार्फेत रुग्णांची तपासणी केली जात आहे़ आतापर्यंत सोळा लाखांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी पूर्ण झाली आहे़ त्यापैकी दोन लाख रुग्णांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे़ कोरोना संकटाच्या काळात आरोग्य विभागाकडून नागरिकांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे़ तरी नागरिकांची योेग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिवचंद्र सांगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़प्रश्न : कोरोना आजाराची जनजागृती ग्रामीण भागात कशी केली जाते?उत्तर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती काही महिन्यांपासून सुरू आहे़ त्यासाठी डॉक्टर, आशा सेविका यांच्या मदतीने गावात दवंडी, होर्डिंग्ज, बॅनर, गावोगावी सभा घेऊन कोरोना विषाणूची लागण व उपाय यासंदर्भात माहिती दिली जात आहे़प्रश्न : जिल्ह्यात आतापर्यंत किती साथरोग कक्ष स्थापन झाले आहेत?उत्तर : जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ सदरील कक्षात कार्यरत अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील क्वारंटाईन असलेले संशयित रुग्णांची दैनंदिनी दूरध्वनीद्वारे विचारणा करून त्यांच्या आरोग्याच्या सद्य:स्थितीबाबत दिवसातून दोनवेळा माहिती घेतात़प्रश्न : संशयित रुग्णांची तपासणी कशा पध्दतीने होते?उत्तर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत डॉक्टर्स, नर्स तसेच आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेतली जात आहे़ याबाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती तातडीने प्रशासनाकडे पाठविली जाते़ सर्वेक्षणात सर्दी, सततचा खोकला, प्रमाणापेक्षा जास्त ताप व अन्य लक्षणे आढळून येणाऱ्या त्या व्यक्तीचे स्वॅॅब तपासणीसाठी पाठविले जातात़ रुग्ण तपासणी व नियोजनासाठी जिल्ह्यात १८ कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे़ त्यातुन रुग्णांची दररोज तपासणी होते़शहरात विनाकारण फिरणे टाळावेकोरोनावर सध्या औषधी उपलब्ध नाही, त्यामुळे काळजी घेणे एकमेव उपाय आहे़त्यासाठी प्रत्येकाने आपला जीव कसा वाचविता येईल याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे़ शहरात लॉकडाऊन असतानाही नागरिक बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत फिरतात़ बाहेर विनाकारण फिरणे म्हणजे तुम्हीच या आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे़भीती बाळगू नका; पण खबरदारी घ्याजिल्ह्यात कोरोनाबाबत जनजागृती व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे़ तरीही समाजात समज-गैरसमज मोठ्या प्रमाणात आहे़ सर्दी किंवा खोकला जरी झाला तरी घाबरून डॉक्टरांकडे येतात़ मात्र घाबरून जाऊ नका, पण खबरदारी देखील घेण्याची गरज आहे़ पावसाळ्यात साथीचे आजाराची लागण पटकन होते़ मात्र शंभरपेक्षा अधिक ताप, सर्दी, सतत खोकला, श्वास घेण्याचा त्रास तसेच संशयित व्यक्तीशी संपर्क आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्याही डॉ, सांगळे यांनी दिला़

टॅग्स :Dhuleधुळे