शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने  शिक्षकाचे धुळे जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:37 IST

न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

ठळक मुद्देअमृतसागर यांना बेकायदेशीर विस्थापित करण्यात आलेविस्थापित करण्याबाबत कुठलाही आदेश दिला नाहीन्याय मिळण्यासाठी शिक्षक दिनापासूनच सुरू केले आंदोलन

लोकमत आॅनलाइनधुळे : जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी  एकत्रिकरण अंतर्गत झालेला अन्याय दूर करून न्याय मिळावा या मागणीसाठी चिंचखेडे (ता. साक्री) येथील शिक्षक भास्कर निंबा अमृतसागर यांनी  शिक्षक दिनापासून  जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. अमृतसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ फेब्रुवारी १७ च्या बदली निर्णयानुसार संवर्ग १ व संवर्ग २ यांनी मी जि.प.शाळा सावळदे (ता. धुळे) येथे कार्यरत असतांना मला व माझ्या पत्नी कल्पना झाल्टे (जि.प.शाळा, दिवाणमाळा,ता.धुळे) यांना खो दिल्याने विस्थापित झालो. संवर्ग ४ प्रमाणे बदलीसाठी २० शाळा आॅनलाइन पद्धतीने पसंतीक्रमाने दिल्या. त्यानुसार लळिंग जि.प. शाळा मला देण्यात आली. परंतु पत्नीला विस्थापित यादीत समाविष्ट करण्यात आले. पत्नीला न्याय मिळाला नाही.पती-पत्नी जि.प. सेवेत असतांना व ३० कि.मी.च्या अंतरात असतांना २८ मे १८च्या आदेशान्वये अमृतसागर यांना पुन्हा विस्थापित करण्यात आले. याबाबत जि.प.प्रशासन व शासनस्तराव त्यांना कुठल्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाही. विस्थापित करण्याबाबत कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे अमृतसागर यांचे म्हणणे आहे. पती-पत्नी दोघेही ३० कि.मी.च्या आत कार्यरत असतांना संवर्ग ५च्या बदली प्रक्रियेत भास्कर अमृतसागर यांना चिंचखेडे (ता. साक्री) तर त्यांची पत्नी कल्पना झाल्टे यांना बोरकुंड (ता. धुळे) येथे पदस्थापित करण्यात आले. पती-पत्नी एकत्रीकरणात अन्याय होऊ नये असे शासन आदेश आहेत. मात्र भास्कर दाम्पत्याला पदस्थापित केलेल्या गावांमध्ये ७० कि.मी.पेक्षा जास्त अंतर आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र न्याय मिळाला नाही. न्याय मिळावा यासाठी त्यांनी शिक्षक दिनापासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.  भास्कर अमृतसागर हे  संसारपयोगी साहित्य घेऊनच आंदोलनाला बसले आहे. त्यांचे हे आंदोलन लक्षवेधक ठरत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे