शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने  शिक्षकाचे धुळे जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:37 IST

न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

ठळक मुद्देअमृतसागर यांना बेकायदेशीर विस्थापित करण्यात आलेविस्थापित करण्याबाबत कुठलाही आदेश दिला नाहीन्याय मिळण्यासाठी शिक्षक दिनापासूनच सुरू केले आंदोलन

लोकमत आॅनलाइनधुळे : जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी  एकत्रिकरण अंतर्गत झालेला अन्याय दूर करून न्याय मिळावा या मागणीसाठी चिंचखेडे (ता. साक्री) येथील शिक्षक भास्कर निंबा अमृतसागर यांनी  शिक्षक दिनापासून  जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. अमृतसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ फेब्रुवारी १७ च्या बदली निर्णयानुसार संवर्ग १ व संवर्ग २ यांनी मी जि.प.शाळा सावळदे (ता. धुळे) येथे कार्यरत असतांना मला व माझ्या पत्नी कल्पना झाल्टे (जि.प.शाळा, दिवाणमाळा,ता.धुळे) यांना खो दिल्याने विस्थापित झालो. संवर्ग ४ प्रमाणे बदलीसाठी २० शाळा आॅनलाइन पद्धतीने पसंतीक्रमाने दिल्या. त्यानुसार लळिंग जि.प. शाळा मला देण्यात आली. परंतु पत्नीला विस्थापित यादीत समाविष्ट करण्यात आले. पत्नीला न्याय मिळाला नाही.पती-पत्नी जि.प. सेवेत असतांना व ३० कि.मी.च्या अंतरात असतांना २८ मे १८च्या आदेशान्वये अमृतसागर यांना पुन्हा विस्थापित करण्यात आले. याबाबत जि.प.प्रशासन व शासनस्तराव त्यांना कुठल्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाही. विस्थापित करण्याबाबत कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे अमृतसागर यांचे म्हणणे आहे. पती-पत्नी दोघेही ३० कि.मी.च्या आत कार्यरत असतांना संवर्ग ५च्या बदली प्रक्रियेत भास्कर अमृतसागर यांना चिंचखेडे (ता. साक्री) तर त्यांची पत्नी कल्पना झाल्टे यांना बोरकुंड (ता. धुळे) येथे पदस्थापित करण्यात आले. पती-पत्नी एकत्रीकरणात अन्याय होऊ नये असे शासन आदेश आहेत. मात्र भास्कर दाम्पत्याला पदस्थापित केलेल्या गावांमध्ये ७० कि.मी.पेक्षा जास्त अंतर आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र न्याय मिळाला नाही. न्याय मिळावा यासाठी त्यांनी शिक्षक दिनापासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.  भास्कर अमृतसागर हे  संसारपयोगी साहित्य घेऊनच आंदोलनाला बसले आहे. त्यांचे हे आंदोलन लक्षवेधक ठरत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे