शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने  शिक्षकाचे धुळे जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:37 IST

न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

ठळक मुद्देअमृतसागर यांना बेकायदेशीर विस्थापित करण्यात आलेविस्थापित करण्याबाबत कुठलाही आदेश दिला नाहीन्याय मिळण्यासाठी शिक्षक दिनापासूनच सुरू केले आंदोलन

लोकमत आॅनलाइनधुळे : जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी  एकत्रिकरण अंतर्गत झालेला अन्याय दूर करून न्याय मिळावा या मागणीसाठी चिंचखेडे (ता. साक्री) येथील शिक्षक भास्कर निंबा अमृतसागर यांनी  शिक्षक दिनापासून  जिल्हा परिषदेसमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. अमृतसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ फेब्रुवारी १७ च्या बदली निर्णयानुसार संवर्ग १ व संवर्ग २ यांनी मी जि.प.शाळा सावळदे (ता. धुळे) येथे कार्यरत असतांना मला व माझ्या पत्नी कल्पना झाल्टे (जि.प.शाळा, दिवाणमाळा,ता.धुळे) यांना खो दिल्याने विस्थापित झालो. संवर्ग ४ प्रमाणे बदलीसाठी २० शाळा आॅनलाइन पद्धतीने पसंतीक्रमाने दिल्या. त्यानुसार लळिंग जि.प. शाळा मला देण्यात आली. परंतु पत्नीला विस्थापित यादीत समाविष्ट करण्यात आले. पत्नीला न्याय मिळाला नाही.पती-पत्नी जि.प. सेवेत असतांना व ३० कि.मी.च्या अंतरात असतांना २८ मे १८च्या आदेशान्वये अमृतसागर यांना पुन्हा विस्थापित करण्यात आले. याबाबत जि.प.प्रशासन व शासनस्तराव त्यांना कुठल्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाही. विस्थापित करण्याबाबत कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे अमृतसागर यांचे म्हणणे आहे. पती-पत्नी दोघेही ३० कि.मी.च्या आत कार्यरत असतांना संवर्ग ५च्या बदली प्रक्रियेत भास्कर अमृतसागर यांना चिंचखेडे (ता. साक्री) तर त्यांची पत्नी कल्पना झाल्टे यांना बोरकुंड (ता. धुळे) येथे पदस्थापित करण्यात आले. पती-पत्नी एकत्रीकरणात अन्याय होऊ नये असे शासन आदेश आहेत. मात्र भास्कर दाम्पत्याला पदस्थापित केलेल्या गावांमध्ये ७० कि.मी.पेक्षा जास्त अंतर आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत पदस्थापना करतांना पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र न्याय मिळाला नाही. न्याय मिळावा यासाठी त्यांनी शिक्षक दिनापासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर कंदिल लावून बिºहाड आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.  भास्कर अमृतसागर हे  संसारपयोगी साहित्य घेऊनच आंदोलनाला बसले आहे. त्यांचे हे आंदोलन लक्षवेधक ठरत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे