धुळे : महागाई बेरोजगारी आणि भागीदारी हे या तीन मुद्द्यांवरच केंद्राची वाटचाल सुरू आहे हे तीन प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरला आहे अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी धुळ्यातील चौक सभेत केली. भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुल गांधी यांचे धुळ्यात आगमन झाले.
आग्रा रोड वरून त्यांची यात्रा निघाली आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले स्वागत स्वीकारल्यानंतर खासदार राहुल गांधी यांची यात्रा पुढे मार्गस्थ झाली. मनोहर टॉकीज समोरील छत्रपती शिवाजी महाराज येथे यात्रा पोहोचली. खासदार राहुल गांधी म्हणाले केवळ मोजके लोक देश चालवत आहे वेगवेगळ्या करायच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातून पैसा गोळा केला जात आहे लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे ईव्हीएम मशीन बद्दल त्यांनी शंका उपस्थित केली