शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

भूजल पातळीत १.७३ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:45 IST

भूजल सर्वेक्षण विभाग : जिल्ह्यातील निरीक्षण १०७ विहिरीची पाहणी ; आगामी वर्षात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी

धुळे : गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या धुळे जिल्ह्यात यावर्षी दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत तब्बल १.७३ मीटरने वाढ झालेली आहे. भूजन सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील १०७ निरीक्षण विहिरींची पहाणी केल्यानंतर ही परिस्थिती आढळून आली. भूजल पातळीत वाढ झाल्याने पुढील वर्षी जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता जवळपास कमीच आहे.गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने, सर्वच तालुक्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. पाणी टंचाईच्या निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईचा आराखडा तयार करावा लागत होता. जिल्हयात धुळे, शिंदखेडा या तालुक्यातील अनेक गावांना टॅँकर, विहिर अधिग्रहण करूनच पाणी पुरवठा करावा लागत होता. जिल्ह्यात कमी पावसामुळे भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात घट आहे़ मात्र यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले, विहिरी तुडूंब भरल्या. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सप्टेंबर २०१९ अखरेपर्यंत झालेल्या पावसानंतर जिल्ह्यातील १०७ निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या. यात धुळे तालुक्यातील ३३, साक्री तालुक्यातील ३१, शिंदखेडा तालुक्यातील २५ व शिरपूर तालुक्यातील १८ विहिरींचा समावेश आहे. या १०७ विहिरींच्या नोंदीनुसार जिल्ह्याच्या भूजल पातळीत १.७३ मीटरने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.टंचाईची झळ कमी बसणारधुळे जिल्हा हा अवर्षण प्रवण भागात असल्याने, जिल्ह्यातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने, जिल्हयात पाणी टंचाईची झळ बसणार नाही असा अंदाज आहे. टंचाईची झळ बसलीच तर ती अगदी शेवटच्या टप्यात जाणवू शकते. मात्र टंचाईग्रस्त गावांची संख्या खूपच कमी राहण्याची शक्यता आहे.प्रतिक्षेनंतर दिलासाअनेक वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर यंदा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे़ त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी उपलब्ध जलसाठ्यातून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणारा आहे़ तर पाणीप्रश्न देखील सुटणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे