शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शहर बंद तर बाजारपेठ सुरूच जनता कफ्युसाठी प्रशासन सज्ज । महापालिकेकडून करणार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:49 IST

जिल्हा प्रशासनाने केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून आले.

धुळे : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी यांनी शनिवारपासून हॉटेल्स, पान टपरी, रसवंती, लग्न समारंभ यांच्यावर ३१ मार्चपर्यंत बंदी आणली आहे. असे असतांना शनिवारी शहरातील हॉटेल्स, रसवंती बंद होत्या. मात्र बाजारपेठेत सुरु होती आणि खरेदीसाठी आग्रारोडवर रोजप्रमाणे गर्दी कायम होती. कोरोना विषाणू पसरु नये यासाठी बाजारपेठेतील गर्दी कमी होऊन लोक घरात बसतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून आले.शहरात शनिवारी सकाळपासून मुख्य बाजारपेठेतील हॉटेल्स, पान टपरी आणि रसवंती आदी बंद होत्या. परंतू आग्रारोडवर हॉकर्स नेहमीप्रमाणे लोटगाडया घेऊन उभे होते. दिवसभर आग्रारोडवर नागरिकांची गर्दी दिसून आली.कॉलनी परिसरात आणि प्रमुख रस्ते सोडता अन्य ठिकाणी हॉटेल्स, चहा दुकान, पान टपरी सर्रासपणे खुल्या होत्या. गर्दीने रस्ते गजबजलेले होते. बाजारपेठेत गर्दी आणि हॉटेल्स, चहा दुकान, पान टपऱ्या सुरु असतांना प्रशासनाकडून ते बंद करण्यासाठी विशेष प्रयत्न होतांना दिसत नव्हते.पाच रुग्णांची तपासणीयेथील हिरे महाविद्यालयात शनिवारी पाच रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आले नसून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. तपासणी झालेल्या पाच व्यक्तीपैकी चौघे विदेशातून परतले आहेत. त्यापैकी दोन जणांचा दुबई प्रवास झाला आहे. लंडन व ओमान येथून प्रत्येकी एक व्यक्ती धुळ्यात परतला आहे तर पुणे येथून आलेल्या एकाचा समावेश आहे. या रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांचे नमुने न घेता त्यांना घरी पाठविले. त्यांना १४ दिवस घरी एका स्वतंत्र खोलीत राहण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :Dhuleधुळे