शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेरे पास सिर्फ माँ है !! १४ बालकांनी आईवडील दोघांनाही गमावले, कर्ते व्यक्ती गेल्याने कुटुंबे उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पालकांना हिरावून अनेक बालकांना पोरके केले आहे. पालक गेल्यामुळे या बालकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पालकांना हिरावून अनेक बालकांना पोरके केले आहे. पालक गेल्यामुळे या बालकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. काही बालकांना निवाऱ्याची गरज भासते आहे. तर काहींना मालमत्तेचा हक्क हवा आहे. त्यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. सुरुवातीला जिल्हा स्तरावर कृती दल नेमण्यात आले होते. त्यानंतर तालुका स्तरावरही कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. त्या माध्यमातून आईवडिलांना गमावलेल्या बालकांचा शोध घेता आला आहे. अनाथ झालेल्या बालकांना ठोस मदत करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. आई व वडील दोन्ही गमावलेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपयांची मदत टाकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांना ती रक्कम वापरता येणार आहे. तसेच काही बालकांना मानसिक धक्का बसला आहे. अशा बालकांच्या मदतीसाठी बालकल्याण समिती पुढे सरसावली आहे. त्यांच्याकडून बालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

१४ जणांचे आईवडिलांचे छत्र हरवले

- कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे जिल्ह्यातील १४ बालकांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरवले आहे. आईवडील दोघांना गमावल्यामुळे या बालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

- बालकांच्या मदतीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा कृती दल व तालुकास्तरावर स्थापन झालेल्या कृती दलाच्या माध्यमातून पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे.

- बालकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण व बालकल्याण समितीचे सदस्य मेहनत घेत आहेत.

१ - चारही भावंड झाले अनाथ -

आई - व वडील दोन्ही कोरोनामुळे वारल्याने चार भावंड अनाथ झाल्याची घटना धुळे तालुक्यातील एका गावात घडली आहे. या मुलांचे पालक पुणे येथे वाॅचमनची नोकरी करत होते. मात्र घरातील कर्ती माणसं गेल्याने संपूर्ण कुटुंब उद‌्ध्वस्त झाले आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यातच आईवडिलांचे छत्र हिरावले गेल्याने बालक पूर्णपणे कोसळले आहेत. तालुका कृती दलाने त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे तालुका कृती दलाच्या सदस्य मीना भोसले यांनी सांगितले. आईवडील गमावलेल्या बालकांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यासाठी गावकरी व नातेवाइकांनी पुढे येणे गरजेचे आहे. पालक गमावलेल्या अनेक बालकांची माहिती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे आपल्या परिचयातील कुणाचे पालक कोरोनाने वारले असतील तर अशा बालकांची माहिती शासकीय यंत्रणेकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनीदेखील या कामासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

२ - बहीण करतेय सांभाळ

आई व वडील गमावल्याने तीन भावंडे अनाथ झाल्याची घटना धुळे तालुक्यातील एका गावात घडली आहे. १७ वर्षांची मोठी बहीण आपल्या १२ वर्षीय भाऊ व ८ वर्षीय बहिणीचा सांभाळ करत आहे. आईवडील गेल्याने १७ वर्षीय मुलगी मजुरी करून कुटुंबाचा उदर निर्वाह करत आहे. घरातील कमावती व्यक्ती कोरोनामुळे वारल्याने लहान मुलांवर मजूर करण्याची वेळ आली आहे. तालुका कृती दलाने या कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांच्या बाबतीतील संपूर्ण माहिती प्रशासनाला दिली आहे. गरिबीची परिस्थिती असल्याने संपूर्ण कुटुंब निराधार झाले आहे. शासनाच्या नियमानुसार कुटुंबाला मदत करण्यात येईल त्यासोबतच इतर योजनांच्या माध्यमातूनही त्यांना लाभ देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले असल्याची माहिती तालुका कृती दलाच्या सदस्यांनी दिली. पोरके झालेल्या बालकांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनीही पुढे येण्याची गरज आहे. गावकऱ्यांनी पुढे येऊन बालकांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे.

३ - बालके आणि ७३ वर्षाचे आजोबा

१० वर्षाच्या आतील दोन भावंडं आई व वडिलांच्या निधनाने अनाथ झाली आहेत. वडिलांचे आधीच निधन झाले होते. त्यात कोरोनाने आईलाही हिरावून नेले. त्यामुळे लहानग्यांवर मोठे संकट ओढवले आहे. कुटुंबात केवळ ७३ वर्षाचे आजोबा आहेत. आजोबा त्यांचा सांभाळ करीत आहेत. या बालकांना निवाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यासोबतच त्यांना इतर योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या स्तरावरून अनाथ झालेल्या बालकांना मदत दिली जाणार आहे. मात्र या बालकांना मानसिक आधार देण्यासाठी समाजानेही पुढे येणे आवश्यक आहे. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी भूमिका समाजाने घेतली तर या बालकांना कठीण प्रसंगातून जाताना बळ मिळू शकते. तसेच त्यांच्या नातेवाइकांनीही आस्थेवाईकपणे विचारपूस केली तर त्यांच्यातील पोरकेपणाची भावना कमी होऊ शकते.