शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मेरे पास सिर्फ माँ है !! १४ बालकांनी आईवडील दोघांनाही गमावले, कर्ते व्यक्ती गेल्याने कुटुंबे उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पालकांना हिरावून अनेक बालकांना पोरके केले आहे. पालक गेल्यामुळे या बालकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पालकांना हिरावून अनेक बालकांना पोरके केले आहे. पालक गेल्यामुळे या बालकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. काही बालकांना निवाऱ्याची गरज भासते आहे. तर काहींना मालमत्तेचा हक्क हवा आहे. त्यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. सुरुवातीला जिल्हा स्तरावर कृती दल नेमण्यात आले होते. त्यानंतर तालुका स्तरावरही कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. त्या माध्यमातून आईवडिलांना गमावलेल्या बालकांचा शोध घेता आला आहे. अनाथ झालेल्या बालकांना ठोस मदत करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. आई व वडील दोन्ही गमावलेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपयांची मदत टाकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांना ती रक्कम वापरता येणार आहे. तसेच काही बालकांना मानसिक धक्का बसला आहे. अशा बालकांच्या मदतीसाठी बालकल्याण समिती पुढे सरसावली आहे. त्यांच्याकडून बालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

१४ जणांचे आईवडिलांचे छत्र हरवले

- कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे जिल्ह्यातील १४ बालकांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरवले आहे. आईवडील दोघांना गमावल्यामुळे या बालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

- बालकांच्या मदतीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा कृती दल व तालुकास्तरावर स्थापन झालेल्या कृती दलाच्या माध्यमातून पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे.

- बालकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण व बालकल्याण समितीचे सदस्य मेहनत घेत आहेत.

१ - चारही भावंड झाले अनाथ -

आई - व वडील दोन्ही कोरोनामुळे वारल्याने चार भावंड अनाथ झाल्याची घटना धुळे तालुक्यातील एका गावात घडली आहे. या मुलांचे पालक पुणे येथे वाॅचमनची नोकरी करत होते. मात्र घरातील कर्ती माणसं गेल्याने संपूर्ण कुटुंब उद‌्ध्वस्त झाले आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यातच आईवडिलांचे छत्र हिरावले गेल्याने बालक पूर्णपणे कोसळले आहेत. तालुका कृती दलाने त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे तालुका कृती दलाच्या सदस्य मीना भोसले यांनी सांगितले. आईवडील गमावलेल्या बालकांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यासाठी गावकरी व नातेवाइकांनी पुढे येणे गरजेचे आहे. पालक गमावलेल्या अनेक बालकांची माहिती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे आपल्या परिचयातील कुणाचे पालक कोरोनाने वारले असतील तर अशा बालकांची माहिती शासकीय यंत्रणेकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनीदेखील या कामासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

२ - बहीण करतेय सांभाळ

आई व वडील गमावल्याने तीन भावंडे अनाथ झाल्याची घटना धुळे तालुक्यातील एका गावात घडली आहे. १७ वर्षांची मोठी बहीण आपल्या १२ वर्षीय भाऊ व ८ वर्षीय बहिणीचा सांभाळ करत आहे. आईवडील गेल्याने १७ वर्षीय मुलगी मजुरी करून कुटुंबाचा उदर निर्वाह करत आहे. घरातील कमावती व्यक्ती कोरोनामुळे वारल्याने लहान मुलांवर मजूर करण्याची वेळ आली आहे. तालुका कृती दलाने या कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांच्या बाबतीतील संपूर्ण माहिती प्रशासनाला दिली आहे. गरिबीची परिस्थिती असल्याने संपूर्ण कुटुंब निराधार झाले आहे. शासनाच्या नियमानुसार कुटुंबाला मदत करण्यात येईल त्यासोबतच इतर योजनांच्या माध्यमातूनही त्यांना लाभ देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले असल्याची माहिती तालुका कृती दलाच्या सदस्यांनी दिली. पोरके झालेल्या बालकांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनीही पुढे येण्याची गरज आहे. गावकऱ्यांनी पुढे येऊन बालकांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे.

३ - बालके आणि ७३ वर्षाचे आजोबा

१० वर्षाच्या आतील दोन भावंडं आई व वडिलांच्या निधनाने अनाथ झाली आहेत. वडिलांचे आधीच निधन झाले होते. त्यात कोरोनाने आईलाही हिरावून नेले. त्यामुळे लहानग्यांवर मोठे संकट ओढवले आहे. कुटुंबात केवळ ७३ वर्षाचे आजोबा आहेत. आजोबा त्यांचा सांभाळ करीत आहेत. या बालकांना निवाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यासोबतच त्यांना इतर योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या स्तरावरून अनाथ झालेल्या बालकांना मदत दिली जाणार आहे. मात्र या बालकांना मानसिक आधार देण्यासाठी समाजानेही पुढे येणे आवश्यक आहे. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी भूमिका समाजाने घेतली तर या बालकांना कठीण प्रसंगातून जाताना बळ मिळू शकते. तसेच त्यांच्या नातेवाइकांनीही आस्थेवाईकपणे विचारपूस केली तर त्यांच्यातील पोरकेपणाची भावना कमी होऊ शकते.