शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो, धुळेकर नागरिकांची मनपाला आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री ...

धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री तर झुंडीत हे श्वान फिरत असतात. त्यामुळे परिसरात रात्री एकट्या व्यक्तीने पायी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे झाले आहे. शहरात गल्लोगल्ली त्वचारोग झालेले भटके श्वान फिरताना दिसतात. या श्वानांनी जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी परिस्थिती आहे. ‘या श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो’, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. शहरातील भटक्या श्वानांचा नागरिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले, तेव्हा कॉलनी परिसरात हा प्रश्न रात्री खूपच त्रासदायक बनल्याचे दिसून आले. कॉलनीत रात्री ११ वाजल्यानंतर जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखेच आहे. कारण कॉलनीच्या रस्त्यावर रात्री श्वानांचेच राज्य असते. हे श्वान रात्री दुचाकीवरुन येणाऱ्यांच्या मागे लागतात, तेव्हा दुचाकीस्वार हा श्वानापासून वाचण्यासाठी वेगाने गाडी चालवतो. यामुळे अपघात होण्याची भीती असते आणि रात्री असे अपघात झालेही आहेत. त्यात काहीजण गंभीररित्या जखमीही झाले आहेत.

रोगट श्वान - शहरात त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. घाण पाणी प्यायल्याने अथवा उकिरडयावरील फेकलेले जेवण खाल्ल्याने या श्वानांच्या पाेटात जंत होतात आणि त्यामुळे त्यांना त्वचारोग होतो. यामुळे काही श्वान तर अगदीच विद्रुप दिसतात. अशा श्वानाने जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.

धोकेदायक परिसर - शहरातील सर्वच कॉलनी परिसरात एकसारखीच परिस्थिती आहे. तरीसुद्धा चितोड रोड, मिल परिसर, शासकीय दूध डेअरी परिसर, मालेगाव रोड, वडजाई रोड, देवपुरात वाडीभोकर रोड, नकाणे रोडवरील सर्व कॉलनी, दत्त मंदिर चौक, नगावबारी परिसरातील सर्व कॉलन्यांचा यात समावेश आहे.

त्वचाविकारचा रोग - घाण पाणी आणि उकिरडयावरील फेकलेले पदार्थ खाल्याने भटक्या श्वानांना त्वचारोग होतो. त्यावर उपचार न झाल्यामुळे हा रोग वाढतच जातो. महापालिकेने शहरातील भटक्या श्वानांची पैदास नियंत्रित करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. मनपाने यासाठी निविदाही काढली होती. परंतु, नंतर हे सर्व पेडिंग राहिले. रोगट श्वानांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या पाहिजेत. शहरात काही सोशल संघटना आणि तरुण वैयक्तिकरित्या हे काम करत आहेत. मनपानेही याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा ही समस्या हळूहळू गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.

- डॉ. संजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभाग