शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो, धुळेकर नागरिकांची मनपाला आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री ...

धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री तर झुंडीत हे श्वान फिरत असतात. त्यामुळे परिसरात रात्री एकट्या व्यक्तीने पायी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे झाले आहे. शहरात गल्लोगल्ली त्वचारोग झालेले भटके श्वान फिरताना दिसतात. या श्वानांनी जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी परिस्थिती आहे. ‘या श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो’, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. शहरातील भटक्या श्वानांचा नागरिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले, तेव्हा कॉलनी परिसरात हा प्रश्न रात्री खूपच त्रासदायक बनल्याचे दिसून आले. कॉलनीत रात्री ११ वाजल्यानंतर जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखेच आहे. कारण कॉलनीच्या रस्त्यावर रात्री श्वानांचेच राज्य असते. हे श्वान रात्री दुचाकीवरुन येणाऱ्यांच्या मागे लागतात, तेव्हा दुचाकीस्वार हा श्वानापासून वाचण्यासाठी वेगाने गाडी चालवतो. यामुळे अपघात होण्याची भीती असते आणि रात्री असे अपघात झालेही आहेत. त्यात काहीजण गंभीररित्या जखमीही झाले आहेत.

रोगट श्वान - शहरात त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. घाण पाणी प्यायल्याने अथवा उकिरडयावरील फेकलेले जेवण खाल्ल्याने या श्वानांच्या पाेटात जंत होतात आणि त्यामुळे त्यांना त्वचारोग होतो. यामुळे काही श्वान तर अगदीच विद्रुप दिसतात. अशा श्वानाने जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.

धोकेदायक परिसर - शहरातील सर्वच कॉलनी परिसरात एकसारखीच परिस्थिती आहे. तरीसुद्धा चितोड रोड, मिल परिसर, शासकीय दूध डेअरी परिसर, मालेगाव रोड, वडजाई रोड, देवपुरात वाडीभोकर रोड, नकाणे रोडवरील सर्व कॉलनी, दत्त मंदिर चौक, नगावबारी परिसरातील सर्व कॉलन्यांचा यात समावेश आहे.

त्वचाविकारचा रोग - घाण पाणी आणि उकिरडयावरील फेकलेले पदार्थ खाल्याने भटक्या श्वानांना त्वचारोग होतो. त्यावर उपचार न झाल्यामुळे हा रोग वाढतच जातो. महापालिकेने शहरातील भटक्या श्वानांची पैदास नियंत्रित करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. मनपाने यासाठी निविदाही काढली होती. परंतु, नंतर हे सर्व पेडिंग राहिले. रोगट श्वानांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या पाहिजेत. शहरात काही सोशल संघटना आणि तरुण वैयक्तिकरित्या हे काम करत आहेत. मनपानेही याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा ही समस्या हळूहळू गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.

- डॉ. संजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभाग