शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो, धुळेकर नागरिकांची मनपाला आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री ...

धुळे : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात गल्लोगल्ली आणि प्रत्येक कॉलनीत दिवसभर आणि रात्री तर झुंडीत हे श्वान फिरत असतात. त्यामुळे परिसरात रात्री एकट्या व्यक्तीने पायी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे झाले आहे. शहरात गल्लोगल्ली त्वचारोग झालेले भटके श्वान फिरताना दिसतात. या श्वानांनी जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी परिस्थिती आहे. ‘या श्वानांना आवर घाला हो, रात्री जीव टांगणीला येतो’, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. शहरातील भटक्या श्वानांचा नागरिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले, तेव्हा कॉलनी परिसरात हा प्रश्न रात्री खूपच त्रासदायक बनल्याचे दिसून आले. कॉलनीत रात्री ११ वाजल्यानंतर जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखेच आहे. कारण कॉलनीच्या रस्त्यावर रात्री श्वानांचेच राज्य असते. हे श्वान रात्री दुचाकीवरुन येणाऱ्यांच्या मागे लागतात, तेव्हा दुचाकीस्वार हा श्वानापासून वाचण्यासाठी वेगाने गाडी चालवतो. यामुळे अपघात होण्याची भीती असते आणि रात्री असे अपघात झालेही आहेत. त्यात काहीजण गंभीररित्या जखमीही झाले आहेत.

रोगट श्वान - शहरात त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. घाण पाणी प्यायल्याने अथवा उकिरडयावरील फेकलेले जेवण खाल्ल्याने या श्वानांच्या पाेटात जंत होतात आणि त्यामुळे त्यांना त्वचारोग होतो. यामुळे काही श्वान तर अगदीच विद्रुप दिसतात. अशा श्वानाने जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.

धोकेदायक परिसर - शहरातील सर्वच कॉलनी परिसरात एकसारखीच परिस्थिती आहे. तरीसुद्धा चितोड रोड, मिल परिसर, शासकीय दूध डेअरी परिसर, मालेगाव रोड, वडजाई रोड, देवपुरात वाडीभोकर रोड, नकाणे रोडवरील सर्व कॉलनी, दत्त मंदिर चौक, नगावबारी परिसरातील सर्व कॉलन्यांचा यात समावेश आहे.

त्वचाविकारचा रोग - घाण पाणी आणि उकिरडयावरील फेकलेले पदार्थ खाल्याने भटक्या श्वानांना त्वचारोग होतो. त्यावर उपचार न झाल्यामुळे हा रोग वाढतच जातो. महापालिकेने शहरातील भटक्या श्वानांची पैदास नियंत्रित करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. मनपाने यासाठी निविदाही काढली होती. परंतु, नंतर हे सर्व पेडिंग राहिले. रोगट श्वानांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या पाहिजेत. शहरात काही सोशल संघटना आणि तरुण वैयक्तिकरित्या हे काम करत आहेत. मनपानेही याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा ही समस्या हळूहळू गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.

- डॉ. संजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभाग