शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
2
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
3
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
4
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
6
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
7
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
8
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
9
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
10
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
11
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
12
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
13
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
14
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
15
कमी मार्क मिळाले म्हणून आई-वडील ओरडले, रागाच्या भरात १०वीतील मुलगी छतावर गेली अन्...
16
Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!
17
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
18
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
19
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
20
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित समाज आई-वडील सांभाळण्यात अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:22 IST

निराधारांसाठी आधार ‘मातोश्री वृध्दाश्रम’

ठळक मुद्देआई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठउच्चशिक्षित समाज अपयशीवृध्दाश्रमातील निराधार व्यक्तींना अन्नदानाची व्यवस्थाआजपर्यत २५ वृध्दावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

चंद्रकांत सोनार ।आयुष्यभर अहोरात्र काबाड कष्ट करून मुलांसाठी रक्ताचे पाणी करतो़ केवळ मुलांनी आई-वडीलांचा सांभाळ करावा म्हणून, आज गरीब मुलाकडून सांभाळ होतो़ मात्र उच्चशिक्षित समाज आजही आई-वडील सांभाळण्यास अपयशी ठरत असल्याचे मत मातोश्री वृध्दाश्रमाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केले़प्रश्न : मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना केव्हा व नेमके उद्देश काय आहे ?उत्तर : नकाणे तलाव परिसरात मातोश्री वृध्दाश्रमाची स्थापना ५ सप्टेंबर १९९८ रोजी झाली़ सुरूवातीला अनुदान मिळत होते़ त्यानंतर अनुदानात बंद झाल्यानंतर दानशुर व्यक्तीच्या मदतीने वृध्दाश्रमातील निराधार व्यक्तींना अन्नदानाची व्यवस्था होत आहे़प्रश्न : मुल, सुना नांतवड असा परिवार असतांना ही निराधार होण्याची का वेळ येतेउत्तर : या वृध्दाश्रमात ३७ निराधार जोडपी आहेत़ आई-वडील मुलासाठी कोट्यावधीची मालमत्ता जमवितात़ शेवटी पैशावरून वाद होतात़ मुलगा, सुना नोकरी करतात़ त्यामुळे वृध्दांधा सांभाळणारे कोणी नसल्याने कौटूंबिक वाद होतात़ म्हणून निराधार होण्याची वेळ येते़प्रश्न : आजपर्यत किती निराधारावर अंत्यसंस्कार वृध्दाश्रमाकडून झालाउत्तर : या वृध्दाश्रमात मुख्याध्यापक, शिक्षिका, रेल्वे पोलिस, क्रिकेटपटू, कलावंत, अशा उच्चपदाच्या अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतरचा काळ वृध्दाश्रमात काढला आहे़ येथील सर्वच वृध्द निराधार नाहीत़ तर ज्यांना मुल, सुना, मुलगी, जावाई, नातवंडे, नातू असा परिवार असतांनाही वृध्दाश्रमात राहण्याची वेळ आली आहे़ आई-वडीलांचे अंतिम दर्शन घेण्यास देखील मुलं नकार देतात़ त्यामुळे आजपर्यत २५ वृध्दावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे़आई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठआयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जे घर आई-वडीलासांठी सुरक्षित वाटायचे़ तेच घर कालातंराने असुरक्षित वाटायला लागते़ आपली काळजी घेणारे मुलांसाठी आई-वडील केवळ पैसा कमावण्याचे माध्यम होते़ याची जेव्हा जाणीव होते़ तेव्हा मुलांचा खरा स्वभाव लक्षात येतो़उच्चशिक्षित समाज अपयशीरक्ताचे पाणी करून मुलांना डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक तसेच शासकीय अधिकारी पदापर्यत नेत्यात ज्या आई-वडीलाचे महत्वाचा वाटा असतो़ त्याच उच्चशिक्षित समाजाकडून आई-वडीलांचा सांभाळ करता येत नाही़ सर्वकाही असतांना वृध्दाश्रमात आयुष्य काढावे लागते़

टॅग्स :Dhuleधुळे