कोविड सेवेत कार्यरत असतांना राज्यातील अनेक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असतांना शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे, आता विम्याची मदत न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र विम्याचे पैसे मिळाले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक बाधित १०१ शिक्षक नागपूर जिल्ह्यातील आहेत तर सर्वाधिक १२ मृत्यू धुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे झाले आहे. नगर ३, अमरावती १, औरंगाबाद ४, बीड१, चंद्रपूर २, गडचिरोली १ गोंदिया ३, जळगाव ८, कोल्हापूर ३,नागपूर ४, नांदेड ४, नंदुरबार ५, नाशिक १ परभणी३, पुणे ३, सोलापूर ३ ठाणे २, उस्मानाबाद १, वर्धा ३, यवतमाळ ४ याप्रमाणे जिल्हावार मृत शिक्षकांची संख्या आहे. यापैकी कोणालाही ५० लाखांचे विमा पैसे मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांची सेवा घेण्यापूर्वी प्रत्येक कोविड दवाखान्यात कोविड योद्धाकरिता बेड राखीव असावेत, कोविड सेवा देताना पॉझिटिव्ह आल्यास पुनःश्च कोविड ड्युटी देण्यात येऊ नये, अतिगंभीर आजारग्रस्त, अपंग यांना अश्या सेवेतून वगळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे संघटनेचे
राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर जय भोगेकर, अलका ठाकरे,बळीराम मोरे, बालाजी पांडागळे, राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ,रुखमा पाटील, विभागिय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, वि.सचिव रवींद्र देवरे, जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे कार्याध्यक्ष प्रशांत महाले, ऋषीकेश कापडे, महिला जिल्हाध्यक्ष दीपा मोरे, सरचिटणिस प्रतिभा वाघ, कार्याध्यक्षा सुरेखा बोरसे, रंजना राठोड, मीरा परोडवाड, संगीता ठाकरे, दिलीप वाडेकर यांनी केली.