शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

शेतकऱ्यांसाठी मदतकेंद्र सुरु करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:03 IST

पालकमंत्री दादा भुसे : एकही बाधीत शेतकरी वंचित राहता कामा नये, आमदारांसह पिक नुकसानीचा पाहणी दौरा

साक्री/पिंपळनेर : अतिवृष्टीमुळे व शेत शिवाराचे नुकसानीमुळे सैरभैर झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत देण्यात येणार असून त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून महसूल खाते व कृषी विभागाच्या वतीने लवकरच शेतकºयांसाठी मदत केंद्र सुरु करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी साक्री येथील पत्रकार परिषदेत सांगितले.साक्री तालुक्यातील शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालक मंत्री दादा भुसे तसेच आमदार मंजुळा गावित यांनी मंगळवारी पाहणी दौरा केला. काटवान भागातील विटाई, बेहेड, दारखेल, निळगव्हाण, नाडसे, छाईल, कासारे, गणेशपुर आदी भागातील पिकांची पाहणी केली. या वेळेस उपस्थित शेतकº्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची किती नुकसान झाले याची माहिती दिली.त्यानंतर त्यांनी साक्री येथे पत्रकार परिषदेत बोलताना शेतकºयांच्या पाठीशी सरकार असून त्यांना हेक्टरी २५ हजार तात्काळ मदत देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानंतर शेतकºयांच्या हेक्टरी आर्थिक नुकसान हे निकष लावून उर्वरित मदत देण्याची मागणी त्यांनी केली.यावेळेस पालकमंत्री भुसे यांनी ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला आहे त्या त्यांच्यासाठी तसेच इतर शेतकºयांसाठी सरसकट पंचनामे करण्यात येणार आहेत. सर्वांना आर्थिक मदत मिळणार असून शेतकºयांनी धीर सोडू नये. विमा कंपन्यांनाही शासनाने आदेश दिले आहेत. मानवतेच्या भावनेतून शेतकºयांना मदत करावी. शेतकरी गोंधळलेल्या परिस्थितीत असून अशा शेतकºयांना मार्गदर्शन व्हावे म्हणून कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने तात्काळ मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन म्हणून ते विमा कंपन्यांकडे आपला अर्ज सादर करू शकतील. यासंदर्भात संबंधित बँकांनाही कळविण्यात आले आहे. कृषी विभागाने पिक विमा काढलेल्या शेतकºयांच्या याद्या तात्काळ कृषी विभागाकडे द्यावेत, अशा बँकांना सूचना करण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. यावर्षी २११ टक्के पाऊस झालेला आहे. आतापर्यंत ६० टक्के पंचनामे झाले असून येत्या दोन दिवसात शंभर टक्के पंचनामे होणार आहेत. संकटग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यावर थेट मदत देण्यात येणार आहे. शेतकºयांकडे असलेली कोणतीही सक्तीची वसुली करण्यात येऊ नये, असे आदेश संबंधित विभागाला दिल्या. शेतकºयांच्या मुलाला शैक्षणिक मदत देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे भविष्यात चाराटंचाई होणार असून त्या दृष्टीनेही शासन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वेळेवर पंचनामे व्हावेत म्हणून सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द केल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड, शेती पाईपलाईन वाहून गेले आहेत. त्यांच्यासाठीही शासनस्तरावर मदतीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.या पाहणी दौºयात शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, नरेंद्र गुजराथी, शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले, विधानसभा संघटक पंकज मराठे, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, बांधकाम विभागे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, साक्री पं.स. उपअभियंता संजय बांगर, नायब तहसीलदार असटकर, पिंपळनेर अप्पर तहसीलदार थविल साक्रीचे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे आदी उपस्थित होते.काटवनातील पाहणीनंतर पालकमंत्री भुसे यांनी दहिवेल भागातील काही गावांना पाहणी केली. साक्री येथील विश्रामगृहात तालुक्यातील शेतकºयांचे निवेदन स्वीकारले व मदतीचे आश्वासन दिले.

टॅग्स :Dhuleधुळे