शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

शेतकऱ्यांसाठी मदतकेंद्र सुरु करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:03 IST

पालकमंत्री दादा भुसे : एकही बाधीत शेतकरी वंचित राहता कामा नये, आमदारांसह पिक नुकसानीचा पाहणी दौरा

साक्री/पिंपळनेर : अतिवृष्टीमुळे व शेत शिवाराचे नुकसानीमुळे सैरभैर झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत देण्यात येणार असून त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून महसूल खाते व कृषी विभागाच्या वतीने लवकरच शेतकºयांसाठी मदत केंद्र सुरु करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी साक्री येथील पत्रकार परिषदेत सांगितले.साक्री तालुक्यातील शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालक मंत्री दादा भुसे तसेच आमदार मंजुळा गावित यांनी मंगळवारी पाहणी दौरा केला. काटवान भागातील विटाई, बेहेड, दारखेल, निळगव्हाण, नाडसे, छाईल, कासारे, गणेशपुर आदी भागातील पिकांची पाहणी केली. या वेळेस उपस्थित शेतकº्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची किती नुकसान झाले याची माहिती दिली.त्यानंतर त्यांनी साक्री येथे पत्रकार परिषदेत बोलताना शेतकºयांच्या पाठीशी सरकार असून त्यांना हेक्टरी २५ हजार तात्काळ मदत देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानंतर शेतकºयांच्या हेक्टरी आर्थिक नुकसान हे निकष लावून उर्वरित मदत देण्याची मागणी त्यांनी केली.यावेळेस पालकमंत्री भुसे यांनी ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला आहे त्या त्यांच्यासाठी तसेच इतर शेतकºयांसाठी सरसकट पंचनामे करण्यात येणार आहेत. सर्वांना आर्थिक मदत मिळणार असून शेतकºयांनी धीर सोडू नये. विमा कंपन्यांनाही शासनाने आदेश दिले आहेत. मानवतेच्या भावनेतून शेतकºयांना मदत करावी. शेतकरी गोंधळलेल्या परिस्थितीत असून अशा शेतकºयांना मार्गदर्शन व्हावे म्हणून कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने तात्काळ मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन म्हणून ते विमा कंपन्यांकडे आपला अर्ज सादर करू शकतील. यासंदर्भात संबंधित बँकांनाही कळविण्यात आले आहे. कृषी विभागाने पिक विमा काढलेल्या शेतकºयांच्या याद्या तात्काळ कृषी विभागाकडे द्यावेत, अशा बँकांना सूचना करण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. यावर्षी २११ टक्के पाऊस झालेला आहे. आतापर्यंत ६० टक्के पंचनामे झाले असून येत्या दोन दिवसात शंभर टक्के पंचनामे होणार आहेत. संकटग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यावर थेट मदत देण्यात येणार आहे. शेतकºयांकडे असलेली कोणतीही सक्तीची वसुली करण्यात येऊ नये, असे आदेश संबंधित विभागाला दिल्या. शेतकºयांच्या मुलाला शैक्षणिक मदत देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे भविष्यात चाराटंचाई होणार असून त्या दृष्टीनेही शासन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वेळेवर पंचनामे व्हावेत म्हणून सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द केल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड, शेती पाईपलाईन वाहून गेले आहेत. त्यांच्यासाठीही शासनस्तरावर मदतीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.या पाहणी दौºयात शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, नरेंद्र गुजराथी, शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले, विधानसभा संघटक पंकज मराठे, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, बांधकाम विभागे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, साक्री पं.स. उपअभियंता संजय बांगर, नायब तहसीलदार असटकर, पिंपळनेर अप्पर तहसीलदार थविल साक्रीचे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे आदी उपस्थित होते.काटवनातील पाहणीनंतर पालकमंत्री भुसे यांनी दहिवेल भागातील काही गावांना पाहणी केली. साक्री येथील विश्रामगृहात तालुक्यातील शेतकºयांचे निवेदन स्वीकारले व मदतीचे आश्वासन दिले.

टॅग्स :Dhuleधुळे