शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाने रिक्त पदे लवकर भरण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST

गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही ...

गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परंतु आरोग्य कर्मचारीही मनुष्यच आहे. याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यांच्यावर येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मनुष्यबळाची पूर्तता करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी ही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावरच अवलंबून असते. मात्र पुरेशा मनुष्यबळाच्या अभावी ही केंद्रेही ‘आजारी’च आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तृतीय श्रेणीतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० कर्मचारी कार्यरत असून, तब्बल २९९ पदे रिक्त आहेत. शासनाने गेल्या ॲागस्ट महिन्यात रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप रोस्टर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. रिक्त पदांवर पूर्णवेळ कर्मचाऱ्याची निुक्ती झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान कोरोनाचे संकट पुन्हा एकदा निर्माण झालेले आहे. विदर्भ, मराठवाडासह मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढल्याने, चिंता वाढलेली आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये ही देखील अपेक्षा आहे. मात्र संकट सांगून येत नाही. त्यामुळे आपण संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास प्रथम प्राधान्य देणे नितांत गरजेचे झालेेले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनानेही विचार करण्याची गरज आहे.