शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

आरोग्य विभागाने रिक्त पदे लवकर भरण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST

गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही ...

गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परंतु आरोग्य कर्मचारीही मनुष्यच आहे. याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यांच्यावर येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मनुष्यबळाची पूर्तता करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी ही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावरच अवलंबून असते. मात्र पुरेशा मनुष्यबळाच्या अभावी ही केंद्रेही ‘आजारी’च आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तृतीय श्रेणीतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० कर्मचारी कार्यरत असून, तब्बल २९९ पदे रिक्त आहेत. शासनाने गेल्या ॲागस्ट महिन्यात रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप रोस्टर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. रिक्त पदांवर पूर्णवेळ कर्मचाऱ्याची निुक्ती झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान कोरोनाचे संकट पुन्हा एकदा निर्माण झालेले आहे. विदर्भ, मराठवाडासह मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढल्याने, चिंता वाढलेली आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये ही देखील अपेक्षा आहे. मात्र संकट सांगून येत नाही. त्यामुळे आपण संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास प्रथम प्राधान्य देणे नितांत गरजेचे झालेेले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनानेही विचार करण्याची गरज आहे.