शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

आरोग्य विभागाने रिक्त पदे लवकर भरण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST

गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही ...

गेल्या वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा संकटसमयी आरोग्य विभाागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने स्वत: सामना करून दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यातही मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. परंतु आरोग्य कर्मचारीही मनुष्यच आहे. याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यांच्यावर येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी मनुष्यबळाची पूर्तता करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी ही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावरच अवलंबून असते. मात्र पुरेशा मनुष्यबळाच्या अभावी ही केंद्रेही ‘आजारी’च आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तृतीय श्रेणीतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० कर्मचारी कार्यरत असून, तब्बल २९९ पदे रिक्त आहेत. शासनाने गेल्या ॲागस्ट महिन्यात रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप रोस्टर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेली आहे. रिक्त पदांवर पूर्णवेळ कर्मचाऱ्याची निुक्ती झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान कोरोनाचे संकट पुन्हा एकदा निर्माण झालेले आहे. विदर्भ, मराठवाडासह मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढल्याने, चिंता वाढलेली आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये ही देखील अपेक्षा आहे. मात्र संकट सांगून येत नाही. त्यामुळे आपण संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास प्रथम प्राधान्य देणे नितांत गरजेचे झालेेले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनानेही विचार करण्याची गरज आहे.