शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

हॉकर्स आणि अतिक्रमणाचा प्रश्न ‘जीवघेणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे बेरोजगार झाले ल्या अनेकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कारण हाच ...

कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे बेरोजगार झाले ल्या अनेकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कारण हाच व्यवसाय कमी पैशात सुरू होऊ शकतो. शहरातील प्रत्येक कॉलनी परिसर चौकात अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला. शिवाय पाचकंदील चौकापासून थेट महात्मा गांधी पुतळा चौकापर्यंत हे भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत आहे. बेरोजगारीत उलटे-सुलटे धंदे करण्यापेक्षा इमानदारीने भाजीपाला विक्रीचा धंदा खूप चांगला आहे. पण हा धंदा करतांना त्याचा त्रास होऊ नये हे सुद्धा बघितले पाहिजे. तसे न झाल्यास वाद उद्भवतात. त्यातून गेल्या आठवड्यात घडलेली चाकू हल्ल्यासारखी घटना घडते. तसे घडू नये यासाठी या सर्व हॉकर्संना त्यांची हक्काची जागा हॉकर्स झोन म्हणून उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी आहे. पण त्या जबाबदारी मनपाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

दुसरा गंभीर प्रश्न अतिक्रमणाचा आहे. शहरात दररोज कुठल्यातरी भागात एक टपरी पडत आहे. ती टपरीला रीतसर विजेचे मीटर सुद्धा मिळते. एकूणच बेकायदेशीर गोष्टीला हे शासकीय कार्यालय कायदेशीर पाठबळ देतात. या टपऱ्या शहरात भाईगिरी करणाऱ्याच्या असतात. त्यामुळे सर्वांचेच पाठबळ असते. काहींनी तर टपरी भाड्याने देऊन त्याचे भाडे खातात. काही स्वतःची दुकान असताना दुसऱ्याच्या दुकानासमोर टपरी टाकतात. एका मागून एक अशा टपऱ्यांचे अतिक्रमित कॉम्प्लेक्सच तयार होते. ते अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिसतच नाही. यासंदर्भात तक्रार केली तर विभागातील अधिकारीच तक्रारदाराच्या नावासह अतिक्रमणधारकांना कळविण्यात येते. लगेच ते अतिक्रमणधारक तक्रारदाराला धमकविणे, दादागिरी करतात. त्यामुळे तक्रारदार शांत बसतो. असे किस्से शहरात रोजच घडतात. ते पाहता तर महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग हे अतिक्रमण कमी करण्याऐवजी वाढविण्याचेच काम जास्त करतात,असेच दिसते. महापालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचे किंवा पदाधिकारी यांचे वर्चस्व दिसत नाही. यासर्व कारणांमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अतिक्रमित टपऱ्यांमध्ये दोन नंबरचे धंदे ही चालतात. सोडा वॉटरच्या नावाखाली दारू विक्री, पानटपरीच्या नावाखाली सट्टा बेकिंग ही चालते. यातून सर्वांचं विभागांना वेळेवर हप्ता मिळतो, मग अतिक्रमण निघणार कसे.

एकूणच धुळे शहराच्या दृष्टीने हॉकर्स झोन आणि अतिक्रमणाचा प्रश्न ‘जीवघेणा’ ठरत आहे. यावर वेळीच उपाययोजना केली गेली नाहीतर तो नाहूर बनले यात यत्किंचितही शंका नाही. याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची लक्ष देणे आवश्यक आहे.