शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हॉकर्स आणि अतिक्रमणाचा प्रश्न ‘जीवघेणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे बेरोजगार झाले ल्या अनेकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कारण हाच ...

कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे बेरोजगार झाले ल्या अनेकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कारण हाच व्यवसाय कमी पैशात सुरू होऊ शकतो. शहरातील प्रत्येक कॉलनी परिसर चौकात अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला. शिवाय पाचकंदील चौकापासून थेट महात्मा गांधी पुतळा चौकापर्यंत हे भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत आहे. बेरोजगारीत उलटे-सुलटे धंदे करण्यापेक्षा इमानदारीने भाजीपाला विक्रीचा धंदा खूप चांगला आहे. पण हा धंदा करतांना त्याचा त्रास होऊ नये हे सुद्धा बघितले पाहिजे. तसे न झाल्यास वाद उद्भवतात. त्यातून गेल्या आठवड्यात घडलेली चाकू हल्ल्यासारखी घटना घडते. तसे घडू नये यासाठी या सर्व हॉकर्संना त्यांची हक्काची जागा हॉकर्स झोन म्हणून उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी आहे. पण त्या जबाबदारी मनपाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

दुसरा गंभीर प्रश्न अतिक्रमणाचा आहे. शहरात दररोज कुठल्यातरी भागात एक टपरी पडत आहे. ती टपरीला रीतसर विजेचे मीटर सुद्धा मिळते. एकूणच बेकायदेशीर गोष्टीला हे शासकीय कार्यालय कायदेशीर पाठबळ देतात. या टपऱ्या शहरात भाईगिरी करणाऱ्याच्या असतात. त्यामुळे सर्वांचेच पाठबळ असते. काहींनी तर टपरी भाड्याने देऊन त्याचे भाडे खातात. काही स्वतःची दुकान असताना दुसऱ्याच्या दुकानासमोर टपरी टाकतात. एका मागून एक अशा टपऱ्यांचे अतिक्रमित कॉम्प्लेक्सच तयार होते. ते अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिसतच नाही. यासंदर्भात तक्रार केली तर विभागातील अधिकारीच तक्रारदाराच्या नावासह अतिक्रमणधारकांना कळविण्यात येते. लगेच ते अतिक्रमणधारक तक्रारदाराला धमकविणे, दादागिरी करतात. त्यामुळे तक्रारदार शांत बसतो. असे किस्से शहरात रोजच घडतात. ते पाहता तर महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग हे अतिक्रमण कमी करण्याऐवजी वाढविण्याचेच काम जास्त करतात,असेच दिसते. महापालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचे किंवा पदाधिकारी यांचे वर्चस्व दिसत नाही. यासर्व कारणांमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अतिक्रमित टपऱ्यांमध्ये दोन नंबरचे धंदे ही चालतात. सोडा वॉटरच्या नावाखाली दारू विक्री, पानटपरीच्या नावाखाली सट्टा बेकिंग ही चालते. यातून सर्वांचं विभागांना वेळेवर हप्ता मिळतो, मग अतिक्रमण निघणार कसे.

एकूणच धुळे शहराच्या दृष्टीने हॉकर्स झोन आणि अतिक्रमणाचा प्रश्न ‘जीवघेणा’ ठरत आहे. यावर वेळीच उपाययोजना केली गेली नाहीतर तो नाहूर बनले यात यत्किंचितही शंका नाही. याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची लक्ष देणे आवश्यक आहे.