शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

या फरार ९४ आरोपींना आपण पाहिलंत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST

खून, दरोडा, जबरी लूट असो वा अन्य कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येते. संशयावरून ...

खून, दरोडा, जबरी लूट असो वा अन्य कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येते. संशयावरून काही जणांना ताब्यात घेण्यात येते. तर काहींची नावे स्पष्टपणे समोर आल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होत असते. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाते. तरीही संशयित मिळून येत नसल्याने हा आरोपी फरार असल्यावर शिक्कामोर्तब केले जाते. असे जिल्ह्यात ९४ आरोपी आजही फरार असल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी आहे.

बऱ्याच वर्षांपासून

आरोपी सापडेना

- गेल्या बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

- घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येतो. मुदतीत संशयित सापडत नसल्याने फरार घोषित होते.

- तत्पूर्वी संबंधित आरोपीला फरार घोषित करण्यापूर्वी तपासाचे वेगवेगळे सोपस्कार पार पाडणे पोलिसांना बंधनकारक आहे.

- फरार असलेल्या आरोपीसंदर्भात गुन्ह्याची तीव्रतादेखील महत्त्वाची असते. गुन्ह्यानुसार आरोपीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो.

मृत्यूनंतरही तपास होऊ शकतो

एखाद्या प्रकरणात फरार असलेला संशयित मृतावस्थेत सापडल्यानंतर लागलीच हे प्रकरण फाईलबंद होत नसते. त्यासाठीदेखील वेगवेगळे तपास कामांचे सोपस्कार पोलिसांना पार पाडावे लागतात. वरिष्ठांची मदत घेण्यात येते. केवळ त्या एका व्यक्तीपुरता प्रकरणाचा तपास थांबविता येत नाही.

- घटना घडल्यानंतर बऱ्याच प्रकरणांत थोड्या फार दिवसांच्या फरकाने संशयित गजाआड करण्यात येत असतात. त्यात काहींना जामीन मिळतो तर काहींना जामीन नाकारण्यात येतो. पण, गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार संशयित कुठेतरी पळून गेलेले असतात. त्यांचा वेळोवेळी तपास सुरू असतो. सध्या जे आरोपी फरार आहेत त्यांचा तपास लावण्याच्या सूचना संबंधितांना वेळोवेळी देण्यात येत असतात.

- प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक