शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 21:14 IST

सततच्या पावसाचा खरीपांच्या पिकांना फटका : मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेती शिवारांना आले तळ्याचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने कहर केलेला आहे. मंगळवारी रात्री शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. नद्यांना पूर आला. मात्र सर्वाधिक नुकसान खरीप पिकांचे झालेले आहे. कापूससह ज्वारी, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. दरम्यान मंगळवारी सर्वाधिक पाऊस धुळे तालुक्यात झाल्याची नोंद आहे.यावर्षी मृग नक्षत्रापासूनच समाधानकारक पाऊस होत आलेला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. कोरोनाच्या काळात उत्पन्न चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यानंतर होत असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरवले आहे.सप्टेंबर महिन्याच्या ४ व ५ तारखेला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे ज्वारी, मका, बाजरी, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. धुळे व साक्री तालुक्यातील एकूण १४४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधीत झाल्याचा कृषी विभागाचे म्हणणे आहे.यातून बळीराजा सावरत नाही, तोच १९ सप्टेंबर रोजी जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. तर मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे खरीपाच्या आशा जवळपास संपुष्टात आलेल्या आहेत.शिरूड परिरास सर्वाधिक नुकसानधुळे तालुक्यातील शिरूड तालुक्यात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शिरूड भागात मंगळवारी सायंकाळी ७ ते साडेसात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर रात्री नऊ पर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या शेतात ज्वारी, बाजरीची तोडणी झाली असून, कणसे काढण्याचे काम सुरू होते. मात्र पावसामुळे या कणसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे कपाशीच्या कैºया गळून पडल्या आहेत. अनेक शेतांमध्ये तलाव साचलेले आहेत. पाण्याचा निचरा कसा करावा असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिलेला आहे. बोरी परिसरातील सुमारे ६० ते ७० गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे.वडजाईमंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे पीके जमीनदोस्त झाली. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळी सायकाळी सहा ते सात वाजेदरम्यान वादळवाº्यासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. तब्बल दोन ते अडीच तास झालेल्या पावसानमुळे कपाशी, सोयाबीन, बाजरी, आदि पिके वाº्यामुळे जमीनदोस्त झाली. अतिपावसामुळे कपाशी लाल पडली आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी सहाय्यक प्रिती भदाने सह तलाठी दत्तात्रय लहामगे यांनी शेतकºयांना सोबत घेऊन शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. आदेश मिळताच पंचनामे सुरू करू असे त्यांनी सांगितले. सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊसात शेतकº्याचे खूप हाल झाले. नदी नाले तुडुब भरून वाहत असल्याने काही शेतकºयांना शेतातच मुक्काम करावा लागला. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकºयांना भरपाई मिळावी अशी मागणी कैलास बाविस्कर, संतोष देवरे, शरद देवरे, संजय जगदाळे , दिलीप देवरे, संजय महाराज, लोटने देवरे, प्रकाश देवरे, रामकृष्ण सुर्यवंशी आदींनी केली आहे.विंचूरबोरी व कान्होळी नदीच्या परिसरात शिरूड व बोरकुंड मंडळात गेल्या आठवड्यापासून सलग व मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने परिसर झोडपून काढला. ऐन काढणीच्या हंगामात कापुससह खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेल्या पिक नुकसानीबाबत पंचनामा करण्यात यावा अशी मागणी शेतकº्यांनी केली आहे. े परिसरात जूनवणे,दोंदवाड, धामणगाव, विसरणे, विंचूर, चांदे, तरवाडे व विशेषता बोरकुंड परिसरात अधिकच पाऊस आल्याने शेतीच नुकसान झाले आहे. कापूस या नगदी पिकाचे उन्हाळ्यात मे च्या शेवटच्या आठवडयात लागवड केलेला कापुस पहिल्या च वेचणीचा कापुस मुसळधार पावसामुळे गळुन पडला. कैºयापण सडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पिक नुकसानीबाबत पंचनामा करण्यात यावा अशी मागणी संदिप देवरे, डॉ. अशोक पगारे, विंचूर माजी उपसरपंच जनार्दन देसल, बाबाजी देसले, भाऊसाहेब देसले, बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब भदाणे, दोंदवाडचे माजी सरपंच हेमलता देवरे, ईश्वर पाटील आदींनी केली आहे.मालपूरशिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सायंकाळी दमदार पाऊसाने हजेरी लावल्याने शेतशिवारातुन परतीची वाट धरणाºया शेतकºयांसह मजुरांची देखील एकच धांदल उडाली. हा पाऊस रात्रभर सुरुच असल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसुन आले.सध्या येथील परीसरात कापुस वेचणीचे मुख्य काम सुरू आहे. दररोज पाऊस येत असल्यामुळे या पावसाची अवस्था अधिकच बिकट होत असुन दुसरीकडे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मिळतील तेवढे मजुर घेवुन शेतकरी हातातोंडाशी आलेला घास घरादारात आणण्यासाठी धडपड करत आहे. सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने, वेचलेला कापुस झाकण्यासाठी तसेच घरात भरण्याच्या हालचालीची एकच धांदल उडाली. पावसामुळे कापुस बाजरी ज्वारी कांदा पिकाला याचा जोरदार फटका बसला आहे. रात्रभर पाऊसाच्या सरी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होत्या. याशिवाय कांदा पिकांच्या वाफ्यात सतत पाणी असल्याने पात पिवळी पडत आहे. तर बाजरी ज्वारी भुईसपाट झाल्यामुळे अखेर अस्मानी सुलतानी संकटाचा सामना दरवर्षी येथील शेतकº्यांना करावा लागत आहे.