शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST

मालपूरसह परिसरातील शेतकरी कधी अवकाळी, तर कधी अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात सापडतात, तरीदेखील उधार उसनवार करून वेळप्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून ...

मालपूरसह परिसरातील शेतकरी कधी अवकाळी, तर कधी अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात सापडतात, तरीदेखील उधार उसनवार करून वेळप्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड वेळेवर करतात. अशा शेतकऱ्यांना हे सरकार प्रोत्साहन अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठेंगा दाखवत आहे. त्यांची ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा हवेत विरली.

फडणवीस सरकारने सातत्याने अभ्यास करून अटी व शर्तींचा डोंगर उभा करत कर्ज माफी दिली. यामुळे महाविकास आघाडी सरकार सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, अशी आशा होती. मात्र, सप्टेंबर २०१९पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज आहे, अशाच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. यामुळे नियमित कर्ज फेड करणाऱ्या व दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे सरकारने तेव्हा नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार, असे जाहीर केले. मात्र, त्याचे काय झाले, असे येथील शेतकरी आता प्रश्न करताना दिसून येत आहे. हे अनुदान न दिल्यास कर्ज परतफेड करावी की नाही, याचा विचार करावा लागेल. यामुळे थकबाकी वाढल्यास नवल वाटायला नको.

प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली, हा गुन्हा केला का? अशा संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकरी वर्तुळात व्यक्त होत असून, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारने गांभीर्याने बघावे, अशी मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया......

शासनाला नियमित कर्जफेड करणाऱ्यांची थोडी जरी चिंता असेल, तर भविष्यात नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचा विचार करावा लागेल. उधार उसनवारीने, प्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून वेळेवर कर्ज भरले हा गुन्हा केला का, दोन वर्षे झाली तरी प्रोत्साहन अनुदानाची दमडीही आली नाही. कोरोनाच्या या कठीणप्रसंगी प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रामाणिकपणा दाखवा.