शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
4
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
5
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
6
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
7
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
8
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
9
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
10
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
11
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
12
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
13
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
15
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
16
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
17
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
18
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
19
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
20
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST

मालपूरसह परिसरातील शेतकरी कधी अवकाळी, तर कधी अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात सापडतात, तरीदेखील उधार उसनवार करून वेळप्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून ...

मालपूरसह परिसरातील शेतकरी कधी अवकाळी, तर कधी अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात सापडतात, तरीदेखील उधार उसनवार करून वेळप्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड वेळेवर करतात. अशा शेतकऱ्यांना हे सरकार प्रोत्साहन अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठेंगा दाखवत आहे. त्यांची ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा हवेत विरली.

फडणवीस सरकारने सातत्याने अभ्यास करून अटी व शर्तींचा डोंगर उभा करत कर्ज माफी दिली. यामुळे महाविकास आघाडी सरकार सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, अशी आशा होती. मात्र, सप्टेंबर २०१९पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज आहे, अशाच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. यामुळे नियमित कर्ज फेड करणाऱ्या व दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे सरकारने तेव्हा नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार, असे जाहीर केले. मात्र, त्याचे काय झाले, असे येथील शेतकरी आता प्रश्न करताना दिसून येत आहे. हे अनुदान न दिल्यास कर्ज परतफेड करावी की नाही, याचा विचार करावा लागेल. यामुळे थकबाकी वाढल्यास नवल वाटायला नको.

प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली, हा गुन्हा केला का? अशा संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकरी वर्तुळात व्यक्त होत असून, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारने गांभीर्याने बघावे, अशी मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया......

शासनाला नियमित कर्जफेड करणाऱ्यांची थोडी जरी चिंता असेल, तर भविष्यात नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचा विचार करावा लागेल. उधार उसनवारीने, प्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून वेळेवर कर्ज भरले हा गुन्हा केला का, दोन वर्षे झाली तरी प्रोत्साहन अनुदानाची दमडीही आली नाही. कोरोनाच्या या कठीणप्रसंगी प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रामाणिकपणा दाखवा.