शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेला शेतीमाल शासनाने नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 21:52 IST

धुळे : भरड धान्यासह कडधान्याला शासनाने हमीभाव दिला खरा; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेले धान्य खरेदी करण्यास शासनाने नकार ...

धुळे : भरड धान्यासह कडधान्याला शासनाने हमीभाव दिला खरा; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेले धान्य खरेदी करण्यास शासनाने नकार दिल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले. धान्याचा दर्जा ठरविल्याने हमीभाव केवळ कागदावरच राहिला. मूग, उडीद आणि सोयाबीनला शासनाने अनुक्रमे ७ हजार, ६ हजार आणि ३८०० रुपयांचा भाव दिला होता. त्या तुलनेत मूग आणि उडिदाला ८ हजार तर सोयाबीनला ४ हजारापेक्षा अधिक बाजारभाव होता; परंतु अतिवृष्टीमुळे पिकांना पाणी लागल्याने धान्य खराब झाले होते. असे असताना एफएक्यू दर्जाचे अर्थात  केवळ उच्च प्रतीचे धान्य हमीभावाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या धान्याची खरेदी शासनाने केली नाही. खराब झालेले धान्य शेतकऱ्यांना बाजारात कवडीमोल भावात विकावे लागले. त्यांचा उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. सोयाबीनला बाजारात जास्त भाव होता. शासनाने हमीभाव कमी दिला होता.दरम्यान, ज्वारी, बाजरी आणि मका खरेदी सध्या सुरू आहे. अनुक्रमे २६२० रुपये, २१०० रुपये आणि १८५० रुपये हमीभाव दिला आहे. बाजारभावापेक्षा अधिक हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला. धुळे तालुक्यात ८०० क्विंटल ज्वारी, ६५० क्विंटल बाजरी आणि ६ हजार क्विंटल मक्याची खरेदी झाली आहे. शिरपूर तालुक्यात २३६२ क्विंटल मका खरेदी झाला आहे. ज्वारी आणि बाजरीची खरेदी बाकी आहे. नोंदणी मात्र झाली आहे. शिंदखेडा तालुक्यात ६ हजार ५४३ क्विंटल मका, १३ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. बाजरीसाठी २१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्याची खरेदी अजून व्हायची आहे. शासनातर्फे हमीभावाने खरेदी सुरू असली तरी ज्वारी, बाजरी आणि मक्याचादेखील दर्जा शासनाने ठरवला आहे. पाणी लागलेले धान्य शासनाने नाकारल्याने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पावसामुळे कापूस पिकाचेदेखील मोठे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यात कापूस हाती आला; परंतु सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने उशीर केला. त्याआधी खासगी व्यापाऱ्यांनी साडेपाच हजाराच्या भावाने कापूस खरेदी सुरू केली होती; परंतु व्यापारी काटा मारुन शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच वाईट अनुभव येतो. ज्यावेळी शेतकरी कांदा विक्रीसाठी जातो त्यावेळी त्यांचा कांदा कवडीमोल भावाने व्यापारी खरेदी करतात. त्यानंतर साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करीत तोच कांदा ५० ते १०० रुपये किलो दराने विकला जातो. सध्या किरकोळ बाजारात ३० ते ५० रुपये किलो भाव आहे; परंतु बाजार समितीमध्ये मात्र सोमवारी वसमार येथील शेतकऱ्याचा कांदा २१ रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला.

टॅग्स :Dhuleधुळे