शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

अतिवृष्टीतील भरपाईसाठी नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे शासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST

धुळे : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व वित्तहानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी पुन्हा दिल्या असून, ...

धुळे : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व वित्तहानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी पुन्हा दिल्या असून, पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचाही इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा व मालमत्तेच्या नुकसानीचा अहवाल शासनाने मागविला असल्याचेही आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असून, नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. आमदार कुणाल पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विंचूर, शिरुड, बोरकुंड परिसरातील शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण धुळे तालुक्यासह शिरूड, बोरकुंड, बोरी परिसरात अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे खरिपातील सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतांमध्ये पाणी साचून कपाशी, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कडधान्य, आदी खरीप पिके सडू लागलेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने आमदार कुणाल पाटील यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांसोबत शिरुड, बोरकुंड आणि बोरी परिसरात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आमदारांनी धीर दिला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी, रहिवासी पंचनामा करण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी महाविकास आघाडी शासनाने पंचनाम्याचा सविस्तर तपशील मागविला असून, सर्व नुकसानग्रस्तांना पूर्णपणे नुकसानीचा मोबदला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. नुकसानीच्या पाहणी दरम्यान तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, माजी पं. स. सभापती बाजीराव पाटील, माजी जि. प. सदस्य साहेबराव खैरनार, बाजार समितीचे प्रशासक रितेश पाटील, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, संचालक बापू खैरनार, विंचूर येथील ज्येष्ठ नेते शिवाजी बोरसे, जनार्दन देसले, रतनपुरा सरपंच पोपटराव माळी, भैया पटेल, शिरूडचे माजी उपसरपंच आबा शिंदे, एकनाथ देवरे, राजू पवार, रमेश शिंदे,ॲड. बी. डी. पाटील, आबा पाटील, अशोक बोरसे, भाऊसाहेब देसले, सुभाष बोरसे, दगडू माळी, पप्पू भदाणे, दशरथ बोरसे, सुनील चौधरी, प्रभाकर माळी,विलास पाटील यांच्यासह शेतकरी, कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.