शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शेतकऱ्यांना २४ तास वीज, मोफत प्रवासाची सवलत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:41 IST

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांची राज्यपाल कोशारी यांच्याकडे मागणी

धुळे : शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना एसटीत मोफत प्रवासाची सुविधा मिळावी आदी मागण्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करण्यात आल्या. राज्यातील बीजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील (पढावद) यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेण्यात आली. त्यावेळी वरील मागण्या करण्यात आल्या.शिष्टमंडळाने सांगितले की, राज्यात सर्वांना २४ तास वीज उपलब्ध करून दिली जाते. मात्र शेतीसाठी केवळ आठ तासच वीजपुरवठा करण्यात येतो. जो पुरवठा होतो, तोदेखील कमी दाबाने होत असतो. शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून दिल्यास विजेचा वापर थोडाफार वाढेल. मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व देखभाल खर्च कमी होईल. उत्पादनदेखील वाढेल. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत मागील वर्षी ट्रिगरमध्ये बदल करून शेतकऱ्यांना नुकसानकारक करण्यात आले. जे ट्रिगरकधी येऊन शकत नाही असे ट्रिगर ठेवण्यात आले. हे ट्रिगर विशेषत: केळी व डाळिंब फळपिकांचे जास्त नुकसानकारक आहेत. त्यामुळे २०१९ला जे ट्रिगर होते तेच ट्रिगर कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.राज्यातील इतर पुरस्कारप्राप्त व्यक्तींना एसटी बसचा प्रवास मोफत दिला जातो. तशीच सुविधा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनाही देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना टोलमाफी देण्याचीही मागणी केली.दरम्यान, हे निवेदन माझ्या शिफारशीने सरकारला पाठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यपालांना शिष्टमंडळास दिले. तसेच ॲड. प्रकाश पाटील यांनाही आपण कृषीचे पद्मभूषण आहात, असे गौरोद्गार काढले.या शिष्टमंडळात ॲड. प्रकाश पाटील (पढावद), नरेंद्र पाटील (लोणी, ता.चोपडा), हेमंत देशमुख (वाशिम), उत्तमराव ठोंबरे (नाशिक), कृष्णा पवार (औरंगाबाद), अनंता पाटील (हिंगोली), श्रीकांत आखाडे (जालना) यांचा समावेश होता. यांनी राज्यपालांशी चर्चा केली.

टॅग्स :Dhuleधुळे