नंदुरबार : तलावीपाडा, ता. नंदुरबार येथील आजोबा-नातूचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने गावात शोकाकूल वातावरण आहे. गांगुर्डे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.तलावीपाडा येथील बान्या चमाºया गांगुर्डे (५०) हे आपल्या नातवासह राहुल कृष्णा गांगुर्डे (१३) याच्यासोबत धवळीविहीर येथे नातेवाइकांच्या जावळाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी गेले होते. जाऊळ आटोपून विसरवाडी येथे कामानिमित्त थांबले. तेथून तलावीपाडा गावी परत येत असताना हा अपघात घडला. आजोबा-नातूला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बान्या गांगुर्डे यांना दोन मुले, पैकी कृष्णा हा मोठा. त्याला राहुल हा एकुलता एक मुलगा. सध्या शाळेला सुट्या लागल्याने त्याने आजोबांसोबत मोटारसायकलीवर जावळाला जाण्याचा हट्ट धरला. ऊन असल्यामुळे आजोबांनी त्याला नकार दिला होता. परंतु हट्टामुळे त्याला घेऊन जावे लागले. परत येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती तलावीपाडा येथे कळताच नातेवाईक घटनास्थळाकडे धावले. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. सरपंच शत्रुघ्न गांगुर्डे यांनी त्यासाठी मदत केली. रात्रीच दोघांवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.गांगुर्डे कुटुंबीयावर झालेल्या अघातामुळे गावात शोककळा पसरली आहे. राहुल हा मुलगा मनमिळावू व हुशार होता. नुकत्याच झालेल्या परीक्षेत चांगले गुण मिळविणार असल्याचे त्याने वडील कृष्णा यांना सांगितले होते.
एकुलत्या मुलाच्या मृत्यूने गांगुर्डे कुटुंबीयांचा आक्रोश
By admin | Updated: April 19, 2017 00:55 IST