शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

धुळ्यातील गजानन कॉलनीला ‘छावणी’चे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:39 IST

तणावपूर्ण शांतता : पोलीस चौकीची जागा लवकरच बदलणार, बंदोबस्त कायम

ठळक मुद्देघटनेचे गांभिर्य लक्षात घेता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे पोलिसांच्या मदतीला बाहेरुन देखील बंदोबस्त तात्काळ मागविण्यात आला होता़त्यात जळगाव येथून २ अधिकारी ५० कर्मचारी, नंदूरबार येथून ४ अधिकारी ४३ कर्मचारी, नाशिक ग्रामीणमधून २ अधिकारी ४० कर्मचारी आणि याशिवाय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ मधील एक तुकडी लगोलग दाखल झाली़ त्यांनी सुरुवातीला घटनास्थळी निर्माण होत असलेली गर्दी पांगव या भागातील तणावाची स्थिती शांत करण्याचा प्रयत्नही केला़ सध्या या भागात शांतता असलीतरी तणाव कायम आहे़ परिणामी पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : शहरातील गजानन कॉलनी, अरिहंत मंगल कार्यालय परिसरात बुधवारी रात्री दोन समुदायात तणाव निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली होती़ परिस्थिती नियंत्रणात असलीतरी तणाव कायम आहे़ परिणामी पोलिसांचा बंदोबस्त या भागात कायम ठेवण्यात आलेला आहे़ दरम्यान, या भागातील पोलीस चौकीचे स्थलांतर तणावग्रस्त भागात करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत़ घटनास्थळी दगडांचा खचशहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन दोन समुदायात दंगल उसळली़ काय होत आहे, हे समजण्याच्या आत एकमेकांवर दगड भिरकाविण्यात आल्यामुळे परिस्थिती देखील गंभीर झाली होती़ आरडा-ओरड होत असताना घोषणाबाजीही करण्यात आल्याने अधिकच तणाव वाढला होता़ घटनास्थळी दगडांचा खच पडलेला होता़ घटनास्थळी तातडीने पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी पोलीस फौजफाट्यासह दाखल झाला होता़ सोशल मिडीयावर ‘वॉच’!घटनेचे गांभिर्य लक्षात घेता अफवा कोणीही पसरु नये़ यासाठी सोशल मिडीयावर पोलिसांची नजर आहे़ याकामी सायबर सेल सतर्क असून घटनेवर आणि सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे़ कोणी अफवा पसरविताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिला आहे़ वरिष्ठांची घटनास्थळी भेटनाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी तातडीने गुरुवारी सकाळी धुळ्यात येवून घटनास्थळी भेट दिली होती़ त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात येवून त्यांनी पोलीस अधिकाºयांना मार्गदर्शक सूचनाही केल्या़ नव्याने पोलीस चौकीनागरिकांना संरक्षण देण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्याकडे केली होती़ पोलीस चौकी या ठिकाणी असलीतरी ती लांब आहे़ म्हणून ज्या ठिकाणी तणाव कायम असतो त्याच जागेवर चौकी नव्याने उभारण्यात येणार असल्याचे सुतोवाच देण्यात आले आहे़ त्यामुळे या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत़