शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

फुटलेल्या बंधाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:39 IST

भात नदीचे पाणी वाहून चालले : पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी एकमेव जलस्त्रोत

तिसगाव-ढंडाणे : नगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया तिसगाव येथील भात नदीवर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे दोन बंधारे फुटून महिना उलटला आहे. मात्र या प्रकरणी साधी चौकशी करण्याचे सौजन्यही या विभागाने आतापर्यंत दाखविलेले नाही. महिनाभरापासून नदीतील पाणी अक्षरश: वाहून जात आहे. या संपूर्ण परिसरात या बंधाऱ्यांव्यतिरिक्त एकही जलस्त्रोत नाही. त्यामुळे पुढील काळात पिण्यासाठी तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाणी कोठून उपलब्ध होणार, असा यक्ष प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा आहे.या परिसरात गेल्या दीड-दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आता नदीतील हे सर्व पाणी डोळ्यादेखत वाहून जात असल्याने परिसरातील जुन्या जाणत्या ते तरुण शेतकºयापर्यंत सारेच अस्वस्थ आहेत. लघुसिंचन विभागाने आता वेळ न दवडता या बंधाºयांचे बांधकाम करून वाहून जाणारे पाणी कसे अडविता येईल, यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.भात नदीवरील टकाºया वस्तीवर असलेले व तिसगाव आणि ढंडाने या दोन्ही गावांच्या वरच्या बाजूस असलेल्या या बंधाºयांवर आजूबाजूला असलेल्या सुमारे ४० ते ५० विहिरी अवलंबून आहे. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्र भिजते. एकीकडे या परिसरातील शेतकºयांनी गेल्या दुष्काळ परिस्थितीत पाण्यासाठी खूप भटकंती केली आहे. मग ती पिण्याच्या पाण्यासाठी किंवा शेतीसाठी असेल, अशा सर्व परिस्थितीमुळे शेतकरी व ग्रामस्थ त्यात होरपळून निघाले होते. त्यामुळे त्यांना पाणी व जलस्त्रोताचे महत्त्व निश्चित कळलेले आहे. पण ज्यांच्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे त्या संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनीच याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.२०१६-१७ मध्ये जलयुक्त योजनेंतर्गत येथील साठवण बंधाºयाची दुरुस्ती व खोलीकरण कामाचा प्रस्ताव होता. परंतु संबंधित अधिकाºयांनी दुसरीकडेच काम पूर्ण केले. जेथे काम केले तो परिसर या लघुसिंंचन विभागाच्या अखत्यारीतही येत नाही, असे शेतकरी छोटू साहेबराव पाटील, छोटू हटकर, दीपक पाटील, अनिल लांडगे, विशाल भामरे, नामदेव भिल, डोंगर पाटील, युवराज भगत, सुभाष नामदेव पाटील, बापू भामरे, जितेंद्र सुदाम पाटील, सुनील पाटील, भानुदास पाटील आदींनी सांगितले. पाणी पूर्णपणे वाहून जाण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा येथील शेतकरी, ग्रामस्थांनी घेतला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे