शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

केटीवेअरच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

वडजाईसह परिसरात पाणी अडविण्यासाठी एकमेव मोठा के. टी. वेअर बंधारा आहे. डेडरगाव तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर रानमळा धरण भरून ...

वडजाईसह परिसरात पाणी अडविण्यासाठी एकमेव मोठा के. टी. वेअर बंधारा आहे. डेडरगाव तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर रानमळा धरण भरून ओव्हर फ्लो झाल्यानंतर हे केटीवेअरमध्ये पाणी येत असते. नरव्हाळ, वडजाई परिसरात पाणी अडविण्यासाठी लहानलहान बंधारे आहेत; परंतु त्यामध्ये पाणी साठवणूक क्षमता अल्प प्रमाणात आहे, म्हणून ते पावसाळ्यानंतर लगेच कोरडे होतात. नरव्हाळ व वडजाई गावाच्या मध्यभागी अनवर नाल्यावर हा केटीवेअर आहे. याची पाण्याची साठवण क्षमता मोठी आहे; परंतु या केटीवेअर बंधाऱ्याला पश्चिम दिशेने किनाऱ्याला व मध्यभागी अनेक ठिकाणी गळती लागल्यामुळे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बंधाऱ्यात पाणी असते त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या विहिरींना होतो. बारमाही पाणी उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी बारमाही उत्पन्न घेत असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असते; परंतु सध्याच्या परिस्थितीत या केटीवेअरला पावसाळ्यात पाणी असते. पावसाळा संपला की गळतीमुळे पाणी वाहून जाते. आठ महिना बंधारा कोरडाठाक पडलेला असतो. परिसरात पाणी अडविण्यासाठी मोठा बंधारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न घेता येत नाही. तालुक्याचे लोकप्रतिनिधी पी. डब्ल्यूडी विभागाने बंधारा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊन बंधाऱ्याची गळती थाबवावी अशी मागणी शेतकरी रामकृष्ण पाटील मनोज शिंदे संतोष देवरे सुकदेव शिंपी, शरद देवरे, विठ्ठल देवरे, कैलास बाविस्कर, संजय पाटील आदी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.