शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

चार शिक्षकांकडे पाच वर्गांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:44 IST

शासकीय विद्यानिकेतन । शाळेत अनेक वर्षांपासून क्रीडा, चित्रकला शिक्षकच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील विभागीय शासकीय विद्या निकेतन शाळेत सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहे. या शाळेत १२ शिक्षकांची गरज असतांना केवळ चारच शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून शाळेत क्रीडा तर ९ वर्षांपासून चित्रकला शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही.नाशिक विभागाची विद्या निकेतन शाळा ११ जुलै १९७९ मध्ये धुळ्यात स्थलांतरीत झाली. जवळपास सहा एकर एवढ्या प्रशस्त जागेत ही शाळा असून, पूर्वी ‘दगडी शाळा’ म्हणून ही शाळा परिचित होती.  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यानिकेतनमध्ये प्रवेश दिला जातो. धुळ्यात इयत्ता सहावी ते दहावी असे सहा वर्ग आहेत. प्रत्येक वर्गाची विद्यार्थी क्षमता ४०  आहे. मात्र गेल्या काही वर्षात या शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावली आहे. सद्यस्थितीत एका वर्गात २०-२२ विद्यार्थीच आहेत.  एकूण २४० पैकी जवळपास ८० विद्यार्थीच आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगणा या भागातील आहे. तर  धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे.  सहावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, त्यानंतर अजून विद्यार्थी संख्या वाढू शकते असे शाळेतर्फे सांगण्यात आले. शासकीय शाळा असतांना शासनाचे या शाळेकडे दुर्लक्ष झालेले आहे. या शाळेत प्रत्येक वर्गाची एक-एक तुकडी आहे. या शाळेत १२ शिक्षकांचे पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात मात्र चारच शिक्षक कार्यरत आहेत. चार शिक्षकांना पाच वर्गाचा भार सांभाळावा लागतो. शिक्षकांची भरती करावी अशी अनेक वर्षांची मागणी असून, त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसून आले आहे. * क्रीडा, चित्रकला विषयाला शिक्षकच नाही*विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून या शाळेत क्रीडा शिक्षकच नाहीत. असे असतांनाही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी २०१४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत विद्यानिकेतचा पूर्ण संघ सहभागी झाला होता. त्यातून एका विद्यार्थ्याची राष्टÑीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. क्रीडा शिक्षक नसतांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचे त्यावेळी अनेकांनी कौतुक  केले होते.क्रीडा शिक्षकाप्रमाणेच २०१० मध्ये येथील चित्रकला शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी दुसºया कला शिक्षकाची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. हिंदीचीही हिच स्थिती आहे. केवळ शिक्षकच नाही तर प्राचार्यांचे पदही रिक्त असून, सध्या  प्रभारी प्राचार्यांची नियुक्ती केली आहे. त्याचसोबत कार्यालयीन कर्मचाºयांचीही संख्या कमी आहे.   कमी मनुष्यबळावरच शाळेचे सर्व कामकाज सांभाळावे लागते. या शाळेत पुरेशा प्रमाणात शिक्षक, व कार्यालयीन कर्मचाºयांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. विभागस्तरावर असलेल्या एकमेव विद्यानिकेतन शाळेकडे लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज आहे.विद्या निकेतनमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचले आहे, ही शाळेसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. उल्हास पाटील यांच्यासारख्या अनेकांनी या शाळेतून शिक्षण घेतले आहे. दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून विद्यानिकेतनची ख्याती राहिलेली आहे. मात्र आता विद्यार्थी संख्या प्रचंड रोडावलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे