शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

२० लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST

धुळे- अन्न व औषध विभागातील कमी मनुष्यबळामुळे जिल्ह्यातील २० लाख लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. अन्न व औषध ...

धुळे- अन्न व औषध विभागातील कमी मनुष्यबळामुळे जिल्ह्यातील २० लाख लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातील पदे रिक्त आहेत. तसेच कार्यरत अधिकाऱ्यांकडे नंदूरबार व जळगाव जिल्ह्याचाही अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून अधिकाऱ्यांच्या कामावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. मात्र मनुष्यबळ अत्यंत कमी असल्यामुळे २० लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरात असलेल्या मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी अन्न व औषध या दोन्ही विभागांना स्वतंत्र सहायक आयुक्त लाभले आहेत. मात्र त्यांच्याकडे इतरही जिल्ह्यांचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. अन्न विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांच्याकडे नंदूरबार जिल्ह्याचा अतिरिक्त प्रभार आहे तर औषध विभागाचे सहायक आयुक्त विजय जाधव यांच्याकडे जळगावचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. अन्न निरीक्षकाची दोन पदे भरण्यात आली आहेत. तर औषध निरीक्षकांच्या दोन पदांपैकी एक पद भरले असून एक पद रिक्त आहे. लिपिक संवर्गातील पदेही रिक्त आहेत. कमी मनुष्यबळामुळे मेडिकल्सची तपासणी तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी देखील वेळेवर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेडिकल्सच्या तपासणीवर परिणाम -

जिल्ह्यात १६८२ मेडिकल आहेत. तर केवळ एक औषध निरीक्षक आहेत. जिल्ह्यात औषध निरीक्षकाची दोन पदे मंजूर आहेत. मात्र एक पद रिक्त असल्यामुळे एकाच औषध निरीक्षकावर मेडिकल तपासणीची मदार आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे मेडिकल दुकानांच्या नियमित होणाऱ्या तपासणीवर परिणाम झाला आहे. तसेच नवीन तपासण्यांची संख्याही कमी झाली आहे.

हॉटेल तपासणीतही अनियमितता -

जिल्ह्यात परवानाधारक तसेच नोंदणीकृत एकूण ५८० इतकी हॉटेल्स आहेत तर अन्न निरीक्षक केवळ दोन आहेत. यापूर्वी जिल्ह्यात अन्न निरीक्षकांची चार पदे होती. मात्र दोन पदे व्यपगत झाल्याने दोन निरीक्षकांवरच हॉटेल तपासण्याची मदार आहे. हॉटेल तपासणी अनियमितपणे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यात वेळ जातो वाया

अन्न व औषध विभागाशी संबंधित १५० प्रकरणे विविध न्यायालयात सुरू आहेत. त्या खटल्यांमध्येच अधिकाऱ्यांचा बराचसा वेळ वाया जातो. दोंडाईचा, शिंदखेडा, साक्री याठिकाणी काही प्रकरणे दाखल आहेत तर उच्च न्यायालयातही काही खटले सुरू आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थ व सुरक्षित अन्नपदार्थ यासंदर्भात प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत.

प्रतिक्रिया -

तर अतिरिक्त ताण कमी होईल -

पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यास अतिरिक्त कामाचा ताण कमी होईल. मेडिकल व हॉटेलच्या तपासण्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. इतर जिल्ह्यांचाही प्रभार असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे. प्रभार कमी केल्यास धुळे जिल्ह्यावरच लक्ष केंद्रित करता येईल.

विजय जाधव, सहायक आयुक्त औषध विभाग

जिल्ह्यातील मेडिकल्स - १६८२

जिल्ह्यातील हॉटेल्स - ५८०

औषध निरीक्षक - १

अन्न निरीक्षक - २