शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दिलेला शब्द पाळून धुळे शहराचे सर्व प्रश्न सोडवू   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:21 IST

महापालिका निवडणुकीतील विजयानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया

ठळक मुद्देधुळे महापालिकेत पक्षाला बहुमत, ५० जागा पटकावल्याधुळेकर जनतेचे मानले आभार, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त धुळे शहरातील सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला ५० जागांवर विजय मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचे ५० किंवा त्यापेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात धुळेकर जनतेचा विश्वास मोलाचा ठरला. एकहाती बहुमत दिले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळून शहराचे सर्व प्रश्न सोडवू, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी येथे बोलताना दिली. जनतेने हा विजय बहाल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तो आम्ही सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून धुळेकर अनेकांच्या दादागिरी, गुंडगिरीमुळे दबावात होते. तो त्यांनी यावेळी झुगारून दिला. येथील वाहतूक, हॉकर्स, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, भुयारी गटार असे अनेक प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही देत पक्षाला या निवडणुकीत बहुमत देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी येथील जाहीर सभेत केले होते. येथील जनतेने त्यावर विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून दिसत आहे. पक्षाचे येथील आमदार अनिल गोटे यांनी अनेक नाटके केली. पण त्यांना यश आले नाही. जनतेने त्यांना भुईसपाट केले. त्यांनी ते मान्य करावे. त्यांच्या पक्षाला एक जागा मिळाली, ती तरी कशी मिळाली याचे आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले. पक्षाला ५० पेक्षा अधिक जागा निश्चितपणे मिळाल्या असत्या. परंतु माझे गणित थोडे चुकले. माझ्या मतदारसंघात शेंदुर्णी येथेही नगरपंचायतीची निवडणूक असल्याने तिकडे लक्ष द्यावे लागले. त्यामुळे  येथे थोडे प्रयत्न कमी पडले. परंतु तरीही जनतेने भरभरून मतदान करून पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही धुळेकरांना दिलेला शब्द पाळणार असून शहरातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार अनिल गोटे यांच्याबद्दल ते म्हणाले की, त्यांनी आपली भाषा सुधारावी. आपण लोकप्रतिनिधी आहोत, याचे भान त्यांनी बाळगले पाहिजे. त्यांच्यासंदर्भात निर्णय घेण्याइतका मी मोठा नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक