शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अक्कलपाडा धरणातून ५०० क्युसेकने सोडलेले पहिले आवर्तन

By देवेंद्र पाठक | Updated: April 7, 2024 18:21 IST

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वीचगेटमधून ५०० क्युसेकने पहिले आवर्तन सोडण्यात आले, अशी ...

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वीचगेटमधून ५०० क्युसेकने पहिले आवर्तन सोडण्यात आले, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार धरणातून पाणी सोडले. तप्त उन्हाळ्यात पांझरा नदी प्रवाहित झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. ६५० दलघनफूट जलसाठ्यात धुळे तालुक्यासह शिंदखेडा, अमळनेर तालुक्यांतील गावांसाठी पिण्याचे पाणी आरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्यात आले आहे. अक्कलपाडा धरणाची क्षमता ३ हजार ८४० एमसीएफटी एवढी आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पांझरा नदीवरील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांसाठी ५४३.८८९ दलघफू व अमळनेर तालुक्यातील गावांसाठी १०६.६४९ दलघफू असे एकूण ६५०.५३८ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

नदी पात्रातील फळ्या काढण्यात आल्या आहेत. सध्या पांझरा नदीत वीस केटिवेअर आहेत. या केटिवेअरमध्ये पाणी अडविले जाणार नाही. यावर संबंधित यंत्रणेतील पथक लक्ष ठेवून आहेत. अक्कलपाडा धरणाचे तापी संगमापर्यंत पाणी अखंडपणे प्रवाहित राहील याची जबाबदारी ग्रामपंचायत, उपअभियंता, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती उपअभियंता, पाटबंधारे विभाग यांची संयुक्तिक आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात तिन्ही तालुक्यांतील गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते. साधारणपणे दोन आवर्तन सोडले जातात. मात्र, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ, मुडी प. डा, बोदर्डे, कळंबु, ब्राम्हणे, भिलाली, शहापूर, डांगर बु., एकतास, तांदळी, निम, जवखेडा वावडे, एकलहरे, लोण खु. व लोण बु. या गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे. गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून आवर्तन सोडणेकामी मागणी केली होती. जिल्हा परिषदेकडे पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी बाकी आहे.

शेतकरीवर्गाचा लढाअक्कलपाडा धरणाच्या उजव्या-डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे. या न्याय व हक्कासाठी अक्कलपाडा संघर्ष समिती स्थापन करून लढा देणे सुरू केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे