शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अक्कलपाडा धरणातून ५०० क्युसेकने सोडलेले पहिले आवर्तन

By देवेंद्र पाठक | Updated: April 7, 2024 18:21 IST

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वीचगेटमधून ५०० क्युसेकने पहिले आवर्तन सोडण्यात आले, अशी ...

धुळे : अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वीचगेटमधून ५०० क्युसेकने पहिले आवर्तन सोडण्यात आले, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार धरणातून पाणी सोडले. तप्त उन्हाळ्यात पांझरा नदी प्रवाहित झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. ६५० दलघनफूट जलसाठ्यात धुळे तालुक्यासह शिंदखेडा, अमळनेर तालुक्यांतील गावांसाठी पिण्याचे पाणी आरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्यात आले आहे. अक्कलपाडा धरणाची क्षमता ३ हजार ८४० एमसीएफटी एवढी आहे. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पांझरा नदीवरील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांसाठी ५४३.८८९ दलघफू व अमळनेर तालुक्यातील गावांसाठी १०६.६४९ दलघफू असे एकूण ६५०.५३८ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

नदी पात्रातील फळ्या काढण्यात आल्या आहेत. सध्या पांझरा नदीत वीस केटिवेअर आहेत. या केटिवेअरमध्ये पाणी अडविले जाणार नाही. यावर संबंधित यंत्रणेतील पथक लक्ष ठेवून आहेत. अक्कलपाडा धरणाचे तापी संगमापर्यंत पाणी अखंडपणे प्रवाहित राहील याची जबाबदारी ग्रामपंचायत, उपअभियंता, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती उपअभियंता, पाटबंधारे विभाग यांची संयुक्तिक आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात तिन्ही तालुक्यांतील गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते. साधारणपणे दोन आवर्तन सोडले जातात. मात्र, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ, मुडी प. डा, बोदर्डे, कळंबु, ब्राम्हणे, भिलाली, शहापूर, डांगर बु., एकतास, तांदळी, निम, जवखेडा वावडे, एकलहरे, लोण खु. व लोण बु. या गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून आवर्तन सोडण्यात आले आहे. गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून आवर्तन सोडणेकामी मागणी केली होती. जिल्हा परिषदेकडे पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी बाकी आहे.

शेतकरीवर्गाचा लढाअक्कलपाडा धरणाच्या उजव्या-डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे. या न्याय व हक्कासाठी अक्कलपाडा संघर्ष समिती स्थापन करून लढा देणे सुरू केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे