शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

खताच्या भावात ५० टक्के विक्रमी वाढ, मार्केटमधून जुना स्टॉक गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

शिंदखेडा : खताच्या प्रत्येक ५० किलोच्या बॅगमागे ६०० ते ७०० रुपये अशी अचानक विक्रमी ५० टक्के वाढ केल्याने ...

शिंदखेडा : खताच्या प्रत्येक ५० किलोच्या बॅगमागे ६०० ते ७०० रुपये अशी अचानक विक्रमी ५० टक्के वाढ केल्याने मार्केटमधून जुने खत गायब झाले आहे. वाढीव खताबाबत कोणतेच राजकीय पक्ष आवाज उठवायला तयार नसल्याने शेतकरी या खताच्या भाववाढीमुळे शेती करावी की सोडून द्यावी अशी स्थिती शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली असून, यामुळे मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.

शेतकरी आधीच कोरोनाने व लॉकडाऊनने हैराण झाला आहे. त्याने पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यात खते कंपन्यांनी अचानक प्रत्येक बॅगमागे ५० टक्के भाववाढ केली आहे. शेतमालाची या पद्धतीने कधीच वाढ झाली नाही. उलट यावर्षी फळ पिके शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पिकविली. मात्र, भाव नसल्याने व काढणीचा खर्चही निघेनासा झाल्याने सर्व फळ पिकांत गुरे सोडली. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षाही कमी किमतीत कडधान्य व इतर पिके विकली जात आहेत. त्यात खताच्या किमतीत अचानक ५० टक्के एवढी विक्रमी वाढ केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शेती करावी की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी डीएपी खत १२०० रु. प्रतिबॅग मिळत होते ते नवीन रेटनुसार १९०० रुपयांना मिळणार आहे, तसेच नवीन रेटनुसार पोट्याश १००० रु, १२x२६x२६ रुपये १७७५ /-, १२x३२x१६ खत रुपये १८०० /-, १६x१६x१६ खत १४०० रुपये, अशी विक्रमी भाववाढ केली आहे. म्हणून व्यापाऱ्यांनी ही नवीन रेटच्या कमी प्रमाणात खताची मागणी केली आहे.

सदरचे वाढीव रेट हे व्यापाऱ्यांना एक महिना अगोदरच दिले होते. मात्र, नंतर कंपनीने व्यापाऱ्यांना पत्र पाठवून चुकीचे रेट पाठविले गेल्याचे म्हटले होते, असे एका व्यापाऱ्याने खाजगीत सांगितले. कारण गेल्या महिन्यात तीन-चार राज्यांच्या निवडणुका होत्या. त्यामुळेच तर खताची भाववाढ रोखली होती की काय, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.