शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

दर घसरण्याच्या भीतीने मालपूर परिसरात कांदा काढणीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST

हमीभावापेक्षा कमी भाव नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात कांदा ४० ते ...

हमीभावापेक्षा कमी भाव नको, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री होत होता. मात्र, अचानक या आठवड्यात निम्म्यावर २०-२१ रुपयांवर आला. अजून भाव घसरून कवडीमोल भावाने कांदा विक्री करावा लागू नये म्हणून येथील शेतकऱ्यांनी हे पीक काढायला सुरुवात केली आहे. अन्यथा अजून कांदा पूर्ण तयार व्हायला एक महिन्याचा कालावधी लागला असता. यामुळे वजनात घट येणार यासाठी शेतकरी हा कुठेना कुठे नाडलाच जात असल्यामुळे कुठे गेला तुमचा हमीभाव, अशी विचारणा करताना दिसून येत आहे.

दोन हजार रुपये क्विंटल गहूदेखील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या १५००-१६०० क्विंटलने विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरादारात उत्पादन आले की भावात घसरण ही नित्याची बाब झाली आहे. यामुळे हमीभावापेक्षा कमी भाव नको याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या घरादारात उत्पादन आले की भावात घसरण ही आमच्या नशिबाचा भाग आहे. ४० रुपयांचा कांदा २० रुपये झाला. तो पाच रुपये किलोने विकावा लागू नये म्हणून आज तयार होण्याच्या अगोदर इच्छा नसताना काढावा लागला. कुठे गेला तुमचा हमीभाव. यामुळे शेती तोट्याची ठरत आहे, अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी वामन माळी यांनी व्यक्त केली आहे.