शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै-ॲागस्ट २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. नोव्हेंबरमध्ये राज्य निवडणूक ...

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै-ॲागस्ट २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. नोव्हेंबरमध्ये राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार धुळे तालुक्यातील ७२, शिंदखेडा ६३, साक्री ४९ व शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा यात समावेश होता. जिल्ह्यातील ७४७ प्रभागातून १९८८ सदस्य निवडीसाठी तब्बल ६ हजार २०८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीपर्यंत २ हजार ३७५ उमेदवारांनी माघार घेतली. तसेच जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींसह तब्बल ५१२ सदस्यांची निवड बिनविरोध निवड झाल्याने, १४७६ जागांसाठी ३ हजार ३१९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी ३ लाख ७९ हजार ८१३ पैकी २ लाख ९२ हजार १४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केलेले आहे. मतदानाची टक्केवारी ७७ टक्के एवढी राहिली. सर्वाधिक मतदान साक्री तालुक्यात ७७.६३ टक्के झाल्याची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल धुळे तालुक्यात ७७.१७, शिरपूर ७६.३६ व शिंदखेडा तालुक्यात ७६.३४ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदानानंतर मतदान यंत्र तालुक्याच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली असून, त्याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

मतमोजणीची जय्यत तयारी पूर्ण

दरम्यान शुक्रवारी झालेल्या मतदानाची सोमवारी १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.साधारणत: साडेदहा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.

कोणाचे वर्चस्व राहणार?

कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका अतिशय सुरळीत पार पडल्या आहेत. माघारीपर्यंत ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, त्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर अनेक पक्षांनी आपला झेंडा फडकल्याचा दावा केलेला आहे. मात्र सोमवारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

विशेष म्हणजे धुळे, साक्री, शिंदखेडा, व शिरपूर तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये अतिशय चुरशीच्या लढती झालेल्या असून, या गावांच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.