शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 22:04 IST

मुकटी : अकस्मात मृत्यूची नोंद

धुळे : कर्जबाजारीपणाला कंटाळून मुकटी (ता. धुळे) येथील ६० वर्षीय शेतकºयाने राहत्या घरातच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शनिवारी रात्री त्यांनी विष घेतल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले़ तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता़मुकटी येथील जगन नवल पाटील (६०) यांच्याकडे सव्वादोन बिघे शेती होती़ शेतीवरच त्यांच्या परिवाराची उपजिविका सुरू होती. त्यांनी गाडे व बैलजोडी घेण्यासाठी त्यांनी सेंट्रल बँकेकडुन पंचवीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेतले होते़ त्या कर्जाची रक्कम व्याजासह आजपर्यंत साठ ते सत्तर हजार रुपयापर्यंत झाली होती़ घेतलेले कर्ज फेडले न गेल्याने, ते नेहमी बैचेन राहत होते. तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले़ लागवडीचा उत्पादन खर्चही निघू शकला नाही. त्यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने त्यांना नैराश्य आले.१४ डिसेंबरच्या रात्री घरातील कुटुंबियांना त्यांनी कर्जाविषयी माहिती दिली़ त्यानंतर घरातील सर्वजण झोपी गेल्यावर जगन पाटील यांनी फवारणीचे विषारी औषध सेवन करुन जीवनयात्रा संपविली़ त्यांनी आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले़ रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी