शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र

By अतुल जोशी | Updated: March 3, 2023 19:14 IST

कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले. 

विंचुर (धुळे): गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पादन चांगले आले आहे. मात्र उत्पादन येताच भाव  गडगडल्याने, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र भाव वाढण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कापसाची कोंडी सोडवावी अशी मागणी केली आहे.

विंचूर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली.त्यासाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. यावर्षी  उत्पादनही चांगले आले आहे. सुरवातीला कपाशीला १० हजार रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. मात्र काही दिवसातच कपाशीचे भाव कमी होण्यास सुरूवात झाली. कपाशीला कमी भाव मिळत असल्याने, त्यातून उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले. 

भाव वाढतील या अपेक्षेने अनेकांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र दोन महिन्यानंतरही कापसाचे भाव वाढण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने, शेतकरी हतबल झालेले आहे. एकीकडे महागाई गगनाला भिडत असताना, कपाशीला कमी भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. राज्य शासनाकडून कपाशीला भाव मिळत नसल्याने, येथील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून कापूस कोंडी सोडविण्याची मागणी केलेली आहे. निमगूळ परिसरातील शेतकऱीशांताराम पाटील, विजय मोरे, दत्तात्रय बोरसे, अजय मराठे, प्रवीण सोनवणे, जयवंत पाटील, तुकाराम पाटील, महेश सूर्यवंशी, अनिल ठाकरे, आकाश देवरे, सोनाली सपकाळे, दिलीप खिवसरा, गोकुळ देवरे  आदींनी पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे. 

  

टॅग्स :DhuleधुळेFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधानcottonकापूस