शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र

By अतुल जोशी | Updated: March 3, 2023 19:14 IST

कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले. 

विंचुर (धुळे): गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पादन चांगले आले आहे. मात्र उत्पादन येताच भाव  गडगडल्याने, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र भाव वाढण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कापसाची कोंडी सोडवावी अशी मागणी केली आहे.

विंचूर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली.त्यासाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. यावर्षी  उत्पादनही चांगले आले आहे. सुरवातीला कपाशीला १० हजार रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. मात्र काही दिवसातच कपाशीचे भाव कमी होण्यास सुरूवात झाली. कपाशीला कमी भाव मिळत असल्याने, त्यातून उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले. 

भाव वाढतील या अपेक्षेने अनेकांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र दोन महिन्यानंतरही कापसाचे भाव वाढण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने, शेतकरी हतबल झालेले आहे. एकीकडे महागाई गगनाला भिडत असताना, कपाशीला कमी भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. राज्य शासनाकडून कपाशीला भाव मिळत नसल्याने, येथील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून कापूस कोंडी सोडविण्याची मागणी केलेली आहे. निमगूळ परिसरातील शेतकऱीशांताराम पाटील, विजय मोरे, दत्तात्रय बोरसे, अजय मराठे, प्रवीण सोनवणे, जयवंत पाटील, तुकाराम पाटील, महेश सूर्यवंशी, अनिल ठाकरे, आकाश देवरे, सोनाली सपकाळे, दिलीप खिवसरा, गोकुळ देवरे  आदींनी पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे. 

  

टॅग्स :DhuleधुळेFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधानcottonकापूस