शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र

By अतुल जोशी | Updated: March 3, 2023 19:14 IST

कापूस कोंडी सोडविण्यासाठी विंचुरच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले. 

विंचुर (धुळे): गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पादन चांगले आले आहे. मात्र उत्पादन येताच भाव  गडगडल्याने, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र भाव वाढण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कापसाची कोंडी सोडवावी अशी मागणी केली आहे.

विंचूर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली.त्यासाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. यावर्षी  उत्पादनही चांगले आले आहे. सुरवातीला कपाशीला १० हजार रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. मात्र काही दिवसातच कपाशीचे भाव कमी होण्यास सुरूवात झाली. कपाशीला कमी भाव मिळत असल्याने, त्यातून उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले. 

भाव वाढतील या अपेक्षेने अनेकांनी कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र दोन महिन्यानंतरही कापसाचे भाव वाढण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने, शेतकरी हतबल झालेले आहे. एकीकडे महागाई गगनाला भिडत असताना, कपाशीला कमी भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. राज्य शासनाकडून कपाशीला भाव मिळत नसल्याने, येथील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून कापूस कोंडी सोडविण्याची मागणी केलेली आहे. निमगूळ परिसरातील शेतकऱीशांताराम पाटील, विजय मोरे, दत्तात्रय बोरसे, अजय मराठे, प्रवीण सोनवणे, जयवंत पाटील, तुकाराम पाटील, महेश सूर्यवंशी, अनिल ठाकरे, आकाश देवरे, सोनाली सपकाळे, दिलीप खिवसरा, गोकुळ देवरे  आदींनी पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे. 

  

टॅग्स :DhuleधुळेFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधानcottonकापूस