शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती व्यापाऱ्यांच्या वादात शेतकरी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

पिंपळनेर उपबाजार समिती कांदा लिलावासाठी जिल्ह्यासह खान्देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कांदा खरेदीचा लिलाव सुरू होतो. मात्र, ...

पिंपळनेर उपबाजार समिती कांदा लिलावासाठी जिल्ह्यासह खान्देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कांदा खरेदीचा लिलाव सुरू होतो. मात्र, यावर्षी एप्रिल महिना अर्धा उलटला तरी अद्याप लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे. येथे लिलाव प्रक्रिया सुरू होत नसल्याने, काही शेतकरी नाशिक येथे कांदा विक्रीसाठी नेत आहेत.

लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासाठी बाजार समितीने व्यापाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केलेली आहे. मात्र, व्यापारी कागदपत्रे देत नसल्याने, लिलाव प्रक्रिया रखडलेली आहे. यापूर्वी एक दोन व्यापाऱ्यांनी बाजार समितीला कुठलेही कागदपत्र सादर केले नाही. त्या व्यापाऱ्यांनी ४० ते ४५ शेतकऱ्यांचे पैसे दिलेच नाहीत. संबंधित व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलने करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये, यासाठीच खबरदारी म्हणून बाजार समितीने व्यापाऱ्यांकडे काही लायसन्स कागदपत्र, बँक गॅरंटी व रोखीने खरेदी आदी विषय मांडले आहेत. जानेवारीत नोटीस देऊन, तोंडी सूचना, तसेच अंतिम नोटीस देऊन तीन महिने होऊनदेखील एकाही व्यापाऱ्याने कागदपत्र बाजार समितीकडे सादर केलेली नाहीत.

आता शेतकऱ्यांचा कांदा शेतातून काढला जात असता ऐन कांदा विक्री वेळी उपबाजार समिती बंद आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही. तर व्यापारी खासगी खरेदी गोडाऊनवर करीत आहे. येथे शेतकऱ्यांना भाव कमी मिळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे यांनी केला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी अधिक अडचणीत आला असता आता बाजार समिती बंद असल्याने अनेक शेतकरी बाजार समिती सुरू होण्याची वाट पाहात आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नसल्याने या शेतकऱ्यांची कांदा साठवण्यासाठी दमछाक होत आहे.

कोरोनाची महाभयानक परिस्थिती असता नागरिकांकडे पैशांची चणचण भासत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, बाजार समिती व व्यापारी यांच्या अंतर्गत वादात शेतकरी पिळला जात आहे. बाजार समिती बंद आहे. मात्र, एकाही शेतकरी संघटनेचे या प्रश्नाकडे लक्ष नाही, हे विशेष! संचालक मंडळ हा प्रश्न सोडवणार का? हा प्रश्न त्वरित सोडवून लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे.

व्यापाऱ्यांकडून ४५ लाख रुपयांपर्यंत थकबाकी वसूल होणे बाकी आहे. ती व्यापाऱ्यांनी त्वरित भरावी. थकबाकी वसूल होत नसल्याने १२ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार नाही. कोरोनात ५ कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह असल्याने उपचारासाठी पैसे नाहीत, असे कर्मचारी सांगतात.