शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पुलाच्या स्वच्छतेसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 22:18 IST

ठेकेदाराचे दुर्लक्ष : बांधकाम पक्के होण्यासाठी पूलावर पाणी टाकण्यात आले नसल्याचा आरोप

कापडणे : मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कापडणे हद्दितील धमाणे रोडावर तब्बल दीड वर्षानंतर संथ गतीने पूल उभारला गेला आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारीही सुरू झाली आहे. मात्र सदर केलेल्या पुलावर अनावश्यक वाळू व घाणीचा खच साचलेला आहे. यामुळे पडलेल्या वाळूवरून वाहने घसरून मोठा अपघात होण्याची भिती आहे. पुलाची साफसफाई करण्यात यावी यासाठी बुधवारी परिसरातील शेतकऱ्यांनी निषेधात्मक आंदोलन केले.पुलाचे काम विलंबाने केले मात्र अनेक समस्यांच्या गर्तेत पूल अडकला. पुलाचे काम होवून बरेच दिवस झाले मात्र त्यावरील अनावश्यक घाण उचलण्यास सदर ठेकेदाराकडून असमर्थता दिसून येत आहे. बांधकाम केलेल्या पुलावरती नियमित पाणी मारले गेले नाही अशी तक्रार येथील शेतकºयांची आहे. पुलावर बांधकाम करून उरलेली वाळू व पाणी टाकण्यासाठी बनविण्यात आलेले चौकोनी बंधारे काढले नसून मोठ्या प्रमाणात रेती व अनावश्यक कॉंक्रीटचे पक्के मटेरियल, पूलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाºया उरलेल्या खडीचे ढिगारे तसेच पडून आहेत.पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावाला आवश्यक तो दाब दिला गेला नसल्याने पुलाचा व रोडाचा उतार व्यवस्थित काढला गेलेला नाही. दोन्ही बाजूला मातीचा भराव अतिशय अरुंद असून समांतर केलेला नाही.पुलाच्या दोन्ही बाजूस डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण केलेले नसून संरक्षण कठडे बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर पुलावरून वाहने चालवत असताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना रात्री-अपरात्री अंधारात पुलाचा व रोडाचा अंदाज न आल्यास वाहने पुलावरून नाल्यात पडण्याची शक्यता आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजुचे रस्ते अजूनही नादुरुस्त व अत्यंत खराब झालेले आहेत.सदर बांधकाम केलेल्या पुलावरील सर्व समस्या सोडविण्यात याव्यात व पुलावरील घाण तात्काळ उचलावी यासाठी कापडणे येथील शेतकºयांनी पुलाचे काम करणारा सदर विभाग व संबंधित ठेकेदार विरुद्ध निषेधात्मक आंदोलन केले. या आंदोलनात कापडणे येथील शेतकरी चंद्रकांत दत्तात्रय वाघ, राजेंद्र शालिग्राम पाटील, मोहन खलाणे, आनंदा माळी, दत्तात्रय नथू वाघ, बबलू देसले आदी शेतकºयांनी आंदोलन केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे