शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

समोरा-समोर लढतींमुळे निर्माण झाली चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST

श्रीदत्तवायपूर गावात तीन वॉर्डांच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. अर्ज माघारीपर्यंत वॉर्ड क्रमांक ३ मधील एक जागा ...

श्रीदत्तवायपूर गावात तीन वॉर्डांच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. अर्ज माघारीपर्यंत वॉर्ड क्रमांक ३ मधील एक जागा बिनविरोध झाली. आता ८ जागांसाठी २१ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना होत आहे. भाजपच्या पॅनलचे नेतृत्व दत्तात्रय बाबुलाल पाटील तर काँग्रेसच्या पॅनलचे नेतृत्व शिवाजी पाटील व योगेश पाटील हे करीत आहेत. सरळ-सरळ लढत असल्याने, या ठिकाणीही चुरशीचा सामना बघायला मिळतो आहे.

तालुक्यातील खलाणे ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. पाच वॉर्डांतील १३ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र एक जागा बिनविरोध झालेली असून, आता १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे विकास पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल यांच्यातच सामना आहे. विकास पॅनलचे नेतृत्व माजी पोलीस पाटील भगवान पाटील व व रमेश टाटीया हे करीत आहेत. तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व ग्रामस्थ करीत आहेत. या ठिकाणी दोन अपक्ष उमेदवारही आपले भाग्य अजमावत आहेत. दहा वर्षांपूर्वी या गावाची निवडणूक बिनविरोध झालेली होती. या वेळीही गावाच्या एकोप्यासाठी निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न झाले होते. मात्र काही कारणास्तव निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. गेल्या वेळी या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत विकास पॅनलने सत्ता मिळविली होती. त्यापेक्षा अधिक चुरस या वेळच्या निवडणुकीत बघावयास मिळत आहे. त्यामुळे येथील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

डांगुर्णे-सोंडले या ग्रुप ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. अर्ज माघारीपूर्वी या ठिकाणच्या तीन जागा बिनविरोध झालेल्या असून, त्यात डांगुर्णेची एक व सोंडल्याच्या दोन जागांचा समावेश आहे.

चिमठावळ येथेही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सात जागा असून, १४ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. या ठिकाणी एकही जागा बिनविरोध होऊ शकलेली नाही. गेल्या वेळी या ठिकाणी भाजपची सत्ता होती. या ठिकाणी दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत असल्याने, निवडणुकीची रंगत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

अमराळे येथेही ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, येथेही भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना बघावयास मिळत आहे. भाजपच्या पॅनलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सुभाष बोरसे करीत आहेत. तर काँग्रेसच्या पॅनलचे नेतृत्व जयराम जगतराव बोरसे, प्रमोद श्रीराम बोरसे हे करीत आहेत. येथेही ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही पॅनलने कंबर कसलेली आहे. मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकून ग्रामपंचायतीची सत्ता सोपवितात याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे.

शिंदखेडा तालुक्यात अनेक मोठ्या ग्रामंपचायतींच्या निवडणुका होत असून, त्यादेखील अत्यंत चुरशीच्या होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी व त्यानंतर लागणाऱ्या निकालाकडे अनेकांच्या नजरा आत्तापासूनच लागून राहिलेल्या आहेत.