शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:37 IST

सुरेश विसपुते  धुळे  - लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात विविध महिन्यात सात टप्प्यांत मतदान ...

सुरेश विसपुते धुळे  - लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात विविध महिन्यात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मतदान घेतले जाणार आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवीन व आतापर्यंत काही कारणांनी वंचित राहिलेल्या अन्य मतदारांची नोंदणी करण्यास दोन-तीन वेळा विशेष मोहिमा राबविण्यात आला. त्या अंतर्गत सुमारे १० ते १२ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील तब्बल साडेसात हजार मतदारांनी फेब्रुवारी महिन्यात राबविलेल्या प्रत्येकी दोनदिवसीय दोन मोहिमांमध्ये नोंदणी केली आहे. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली असून ४ हजार ३०० दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे एकंदर मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी यावेळी मोठा उत्साह दिसून येत आहे. मात्र एकीकडे मतदारांची संख्या वाढत असली तरी प्र्रत्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येतो. कारण यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी ही बाब प्रकर्षाने दिसून आली आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मतदारांचाही त्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (इव्हीएम)सोबत निवडणुकीत आपण ज्या उमेदवारास मत दिले ते मत त्यालाच गेले किंवा नाही, याबाबत मतदारांना खात्री करून घेण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचाही वापर लोकसभेच्या निवडणुकीपासून केला जाणार आहे.  त्यासाठी मतदारांना या नव्या यंत्राची ओळख व्हावी यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत मोठ्या गावांमध्ये तसेच बाजाराच्या दिवशी जाऊन तेथे डमी मतदान घेण्यात आले.ते करत असताना मतदारांना व्हीव्हीपॅट यंत्राचा वापराबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मतदारांनी त्याचा वापर करून खात्रीही केली. त्यामुळे त्यांच्यात ही यंत्रे वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. आता प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेपर्यंत मतदारांमध्ये मतदानाप्रती जागरूकता वाढविण्यासाठी अजून प्रयत्न होतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी मतदानाची प्रक्रिया तीन महिने चालणार असून त्यामुळे या काळात देशभरात स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, यात शंका नाही. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात आपले नाव आहे का, हे पाहण्याची संधी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली होती. त्या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्या-त्या मतदारयाद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर जिल्ह्यात राबविलेल्या मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकंदर लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत प्रशासनाकडून मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणखी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते. सामाजिक संस्था, संघटनांनीही त्यासाठी पुढे यावे व या राष्टÑीय कार्यात सहकार्य करावे. तरच जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीसह आगामी काळात होणाºया राज्य विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकDhuleधुळे