शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:37 IST

सुरेश विसपुते  धुळे  - लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात विविध महिन्यात सात टप्प्यांत मतदान ...

सुरेश विसपुते धुळे  - लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात विविध महिन्यात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मतदान घेतले जाणार आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवीन व आतापर्यंत काही कारणांनी वंचित राहिलेल्या अन्य मतदारांची नोंदणी करण्यास दोन-तीन वेळा विशेष मोहिमा राबविण्यात आला. त्या अंतर्गत सुमारे १० ते १२ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील तब्बल साडेसात हजार मतदारांनी फेब्रुवारी महिन्यात राबविलेल्या प्रत्येकी दोनदिवसीय दोन मोहिमांमध्ये नोंदणी केली आहे. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली असून ४ हजार ३०० दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे एकंदर मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी यावेळी मोठा उत्साह दिसून येत आहे. मात्र एकीकडे मतदारांची संख्या वाढत असली तरी प्र्रत्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येतो. कारण यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी ही बाब प्रकर्षाने दिसून आली आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मतदारांचाही त्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (इव्हीएम)सोबत निवडणुकीत आपण ज्या उमेदवारास मत दिले ते मत त्यालाच गेले किंवा नाही, याबाबत मतदारांना खात्री करून घेण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचाही वापर लोकसभेच्या निवडणुकीपासून केला जाणार आहे.  त्यासाठी मतदारांना या नव्या यंत्राची ओळख व्हावी यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत मोठ्या गावांमध्ये तसेच बाजाराच्या दिवशी जाऊन तेथे डमी मतदान घेण्यात आले.ते करत असताना मतदारांना व्हीव्हीपॅट यंत्राचा वापराबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मतदारांनी त्याचा वापर करून खात्रीही केली. त्यामुळे त्यांच्यात ही यंत्रे वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. आता प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेपर्यंत मतदारांमध्ये मतदानाप्रती जागरूकता वाढविण्यासाठी अजून प्रयत्न होतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी मतदानाची प्रक्रिया तीन महिने चालणार असून त्यामुळे या काळात देशभरात स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, यात शंका नाही. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात आपले नाव आहे का, हे पाहण्याची संधी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली होती. त्या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्या-त्या मतदारयाद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर जिल्ह्यात राबविलेल्या मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकंदर लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत प्रशासनाकडून मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणखी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते. सामाजिक संस्था, संघटनांनीही त्यासाठी पुढे यावे व या राष्टÑीय कार्यात सहकार्य करावे. तरच जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीसह आगामी काळात होणाºया राज्य विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकDhuleधुळे