शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:37 IST

सुरेश विसपुते  धुळे  - लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात विविध महिन्यात सात टप्प्यांत मतदान ...

सुरेश विसपुते धुळे  - लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात विविध महिन्यात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मतदान घेतले जाणार आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवीन व आतापर्यंत काही कारणांनी वंचित राहिलेल्या अन्य मतदारांची नोंदणी करण्यास दोन-तीन वेळा विशेष मोहिमा राबविण्यात आला. त्या अंतर्गत सुमारे १० ते १२ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील तब्बल साडेसात हजार मतदारांनी फेब्रुवारी महिन्यात राबविलेल्या प्रत्येकी दोनदिवसीय दोन मोहिमांमध्ये नोंदणी केली आहे. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली असून ४ हजार ३०० दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे एकंदर मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी यावेळी मोठा उत्साह दिसून येत आहे. मात्र एकीकडे मतदारांची संख्या वाढत असली तरी प्र्रत्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येतो. कारण यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी ही बाब प्रकर्षाने दिसून आली आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मतदारांचाही त्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (इव्हीएम)सोबत निवडणुकीत आपण ज्या उमेदवारास मत दिले ते मत त्यालाच गेले किंवा नाही, याबाबत मतदारांना खात्री करून घेण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचाही वापर लोकसभेच्या निवडणुकीपासून केला जाणार आहे.  त्यासाठी मतदारांना या नव्या यंत्राची ओळख व्हावी यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत मोठ्या गावांमध्ये तसेच बाजाराच्या दिवशी जाऊन तेथे डमी मतदान घेण्यात आले.ते करत असताना मतदारांना व्हीव्हीपॅट यंत्राचा वापराबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मतदारांनी त्याचा वापर करून खात्रीही केली. त्यामुळे त्यांच्यात ही यंत्रे वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. आता प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेपर्यंत मतदारांमध्ये मतदानाप्रती जागरूकता वाढविण्यासाठी अजून प्रयत्न होतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी मतदानाची प्रक्रिया तीन महिने चालणार असून त्यामुळे या काळात देशभरात स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, यात शंका नाही. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात आपले नाव आहे का, हे पाहण्याची संधी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली होती. त्या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्या-त्या मतदारयाद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर जिल्ह्यात राबविलेल्या मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकंदर लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत प्रशासनाकडून मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणखी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते. सामाजिक संस्था, संघटनांनीही त्यासाठी पुढे यावे व या राष्टÑीय कार्यात सहकार्य करावे. तरच जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीसह आगामी काळात होणाºया राज्य विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकDhuleधुळे