शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

मराठी भाषा जतन करण्याची सर्वांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी अशी वैभव संपन्न भाषा म्हणून मराठी परिचित आहे. ...

भाषांचा भावार्थ मराठी,

बात मराठी, साथ मराठी

जगण्याला या अर्थ मराठी

अशी वैभव संपन्न भाषा म्हणून मराठी परिचित आहे. मराठीत विपूल ग्रंथसंपदा आहे. अशा या मराठी भाषेचे जतन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी अपेक्षा मराठीतील साहित्यिकांनी व्यक्त केली असून, त्याचबरोबरच या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साहित्यिकांनी वरील अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत.

मराठी ही भाषा समृद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षात इंग्रजीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भाषेला कोणाचा विरोध नाही. मात्र आपल्या मातृभाषेचे संवर्धन, जतन करण्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण झाले पाहिजे. जास्तीत जास्त साहित्याचे वाचन झाले पाहिजे. बोलीभाषेतील लोकवाड‌्:मय, लोककला, मौखिक साहित्य, तथा ओवी वाड‌्:मयाची जपणूक म्हणजेच ते ते लिखित स्वरूपात आणून ई-साहित्य म्हणून त्याला अभ्यासण्यासाठी प्रकाशित करणे गरजेचे आहे. अशा या वैभवसंपन्न भाषेला राजभाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही जिल्ह्यातील साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे. तथापी केंद्र सरकारच्या अखत्यारितील संबंधित संस्थेकडून असा दर्जा जाहीर करण्यात विलंब होत आहे, हे खेदजनक आहे. मराठी भाषेलाही लवकरात लवकर राजभाषेचा दर्जा मिळावा.

- डॉ. फुला बागूल,

ज्येष्ठ साहित्यिक, शिरपूर

प्राथमिक शिक्षण बोलीभाषेत व उच्च शिक्षण मराठी भाषेत असावे. जेणेकरून, मराठी जागतिक पातळीवर ज्ञानभाषा होण्यास मदत होईल. जगातील विविध भाषांमधील समाजोपयोगी व ज्ञानसमृद्ध साहित्य मराठीत भाषांतरित होणे गरजेचे आहे.

- डॉ. सदाशिव सूर्यवंशी,

अध्यक्ष, खान्देश साहित्य संघ.

मराठी भाषा वैभव संपन्न आहे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मातृभाषेतूनच विचार व्यक्त करीत, भाषेचे जतन केले पाहिजे.

- प्रा. शशिकला पवार,

लेखिका, धुळे

मराठीचे प्रभावक्षेत्र विस्तारीत कसे जाईल याबद्दल गंभीरपणे आपण विचार करायला हवा. आपल्या रोजच्या जगण्याच्या सगळ्याच अंगामधून मराठीचा सर्व सामर्थ्यानिशी संचार जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत मराठीचा लौकीक वाढणार नाही.

- प्रा.डॅा. आशुतोष पाटील,

मराठी विभाग प्रमुख उमवि.

देशातील प्रत्येक राज्याने आपली भाषा सुरक्षित ठेवलेली आहे. त्यामानाने महाराष्ट्रात मराठी भाषेचे संवर्धन करण्याचा कमी प्रमाणात प्रयत्न झालेला आहे. भाषा विकासासाठी मराठी ग्रंथालयांची संख्या वाढावी.

- सुभाष अहिरे,

अहिराणी साहित्यिक,धुळे

मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोली भाषांचे जतन झाले पाहिजे. मराठीत वाचकांची संख्या वाढली पाहिजे. ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून हे प्रयत्न व्हावे. नवलेखक, कवींना प्रोत्साहान देण्याची गरज आहे.

- रमेश बोरसे,

साहित्यिक,धुळे