शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

मालपूर येथे नागरिकांना व ग्रामपंचायत प्रशासन तसेच कोविड १९ समितीला कोरोनाचा विसर पडला असून सर्व आलबेल सुरू आहे. लग्न ...

मालपूर येथे नागरिकांना व ग्रामपंचायत प्रशासन तसेच कोविड १९ समितीला कोरोनाचा विसर पडला असून सर्व आलबेल सुरू आहे. लग्न समारंभ व अंत्यविधीसाठी घालून दिलेले नियम केवळ कागदावरच शिल्लक आहेत. अशा आशयाचे वृत्त प्रसारीत होताच उपाययोजना सुरुवात करण्यात आली. लग्न समारंभात केवळ ५० लोकांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारप्रसंगी २० जणांच परवानगी राहील. ग्रामस्थांच्या तोंडावर मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई तसेच आपत्कालीन कार्यवाही करण्यात येईल. दुकाने भाजीपाला विक्री सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील,

यानंतर कडक संचारबंदी लागू होईल सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित जमू नये. दुकानावर ग्राहकांना विनामास्क उभे राहू देऊ नये. अन्यथा दुकानदारांवर कार्यवाही करण्यात येईल. असे सर्वानुमते बैठकीत ठरविण्यात आले. याबाबत सायंकाळी गावात दंवडी देण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या सदस्या चंद्रकला पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, उपसरपंच तुकाराम पाटील, माजी सरपंच हेमराज पाटील, ग्रामविकास अधिकारी एल.सी. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अरुण धनगर, जगदीश खंडेराव, संतोष कोळी, पोलीस पाटील बापू बागुल, अंगणवाडी सुपरवायझर सुनंदा थोरात, पत्रकार मोहन चव्हाण, सदाशिव भलकार, रवींद्र राजपूत, आदी सह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.