शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

डीजिटलसह स्वयंअध्यापनावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:02 IST

वान्मथी सी. : जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी प्रतिपादन

धुळे : विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्यांच्या क्षमता, विषयाची आवड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिकविण्यासाठी डिजीटलबरोबरच स्वयंअध्यापनावर  जास्त भर द्यावा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी आज येथे व्यक्त केली. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे उत्कृष्ट कार्य करणाºया जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना  जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून वान्मथी सी. बोलत होत्या. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण देवरे, डायटच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, निरंतरचे शिक्षणाधिकारी नरेंद्र खंडारे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात राजेंद्र विक्रम भामरे (दह्याणे,ता. धुळे), पावबा धनजी बच्छाव (वाजदरे,ता. साक्री), गोकूळ पोपटराव पाटील (चुडाणे, ता. शिंदखेडा), वासुदेव रामदास चाचरे (बभळाज,ता. शिरपूर) या शिक्षकांना मान्यवरांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षकांनी आपल्या परिवारासह हा पुरस्कार स्वीकारला.मी आज मुख्य कायकारी अधिकारी म्हणून नव्हे तर एक विद्यार्थी म्हणून बोलते असे सांगून वान्मथी सी. यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. आपल्याला प्रत्येक शिक्षकाकडून खूप काही शिकायला मिळाले. विद्यार्थी भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात.  प्रत्येक विषय विद्यार्थ्यांना समजेल, त्या विषयाबद्दल त्यांना आवड निर्माण होईल, अशा पद्धती अध्यापन करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. जिल्ह्यात डिजीटल शाळा सुरू झाल्या. त्याचा उपयोग गुणवत्तेत वाढ होण्यासाठी व मुलांना आकर्षिक करण्यासाठी करणे गरजेचे आहे. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वत: शिकवावे. प्रत्येक विषय त्यांना समजवून सांगावा.संदीप माळोदे म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शिक्षकांनी डिजीटल ऐवजी स्वत: शिकवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी प्राचार्य डॉ. विद्या पाटील, हेमंत भदाणे यांच्यासह आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी तर सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी मनीषा वानखेडे यांनी केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी ए.एस. रणदिवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी शशिकांत साळुंखे, प्रशासन अधिकारी थोरात, रंजना साळुंखे, सी.के.पाटील, रेखा पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे