शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST

तालुक्यातील वेल्हाणे येथे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेत विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, झेड.बी.पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रवीणसिंग ...

तालुक्यातील वेल्हाणे येथे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेत विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, झेड.बी.पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांचे ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी डॉ.गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी वेल्हाणेच्या सरपंच शीतल राजेंद्र राजपूत होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील दगडूसिंग परमार, धुळे येथील किशोर बोरसे उपस्थित होते.

डॉ.गिरासे पुढे म्हणाले की, खरे पाहता निसर्गातील सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांनी आपले पर्यावरण बनलेले आहे. यातील मनुष्य, प्राणी, पशुपक्षी, वनस्पती, जमीन, हवा, पाणी, जंगल या प्रत्येक घटकांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. माणूस मात्र स्वार्थासाठी निसर्ग संपदेचा अतिवापर व पर्यावरण प्रदूषित करून सजीवसृष्टीच्या अस्तित्वाला नुकसान पोहोचवत आहे. वाढती लोकसंख्या व प्रगतीच्या नावाखाली होणारा औद्योगिक विकास, वस्ती विस्तारीकरण, रस्ते-महामार्गांची निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर केली जाणारी वृक्षतोड व जंगलतोड, यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. आजपर्यंत पृथ्वीवरील सजीवांच्या ४,५०० पेक्षा जास्त प्रजाती नष्ट झाल्या असून, सजीव सृष्टीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. पर्यावरण समृद्धीसाठी जनतेचे प्रबोधन करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन करणे, पाणी आडवा पाणी जिरवा, निसर्ग संपदेचा व पाण्याचा योग्य वापर, पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट न करणे गरजचे आहे.

सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष जयदीप पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश वाघ, मच्छिंद्र आभाळे, अशोक आहिरे, प्रवीण पाटील, रवींद्र आभाळे, पंकज पाटील, विकास चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.