शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST

तालुक्यातील वेल्हाणे येथे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेत विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, झेड.बी.पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रवीणसिंग ...

तालुक्यातील वेल्हाणे येथे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेत विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, झेड.बी.पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांचे ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी डॉ.गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी वेल्हाणेच्या सरपंच शीतल राजेंद्र राजपूत होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील दगडूसिंग परमार, धुळे येथील किशोर बोरसे उपस्थित होते.

डॉ.गिरासे पुढे म्हणाले की, खरे पाहता निसर्गातील सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांनी आपले पर्यावरण बनलेले आहे. यातील मनुष्य, प्राणी, पशुपक्षी, वनस्पती, जमीन, हवा, पाणी, जंगल या प्रत्येक घटकांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. माणूस मात्र स्वार्थासाठी निसर्ग संपदेचा अतिवापर व पर्यावरण प्रदूषित करून सजीवसृष्टीच्या अस्तित्वाला नुकसान पोहोचवत आहे. वाढती लोकसंख्या व प्रगतीच्या नावाखाली होणारा औद्योगिक विकास, वस्ती विस्तारीकरण, रस्ते-महामार्गांची निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर केली जाणारी वृक्षतोड व जंगलतोड, यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. आजपर्यंत पृथ्वीवरील सजीवांच्या ४,५०० पेक्षा जास्त प्रजाती नष्ट झाल्या असून, सजीव सृष्टीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. पर्यावरण समृद्धीसाठी जनतेचे प्रबोधन करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन करणे, पाणी आडवा पाणी जिरवा, निसर्ग संपदेचा व पाण्याचा योग्य वापर, पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट न करणे गरजचे आहे.

सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष जयदीप पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश वाघ, मच्छिंद्र आभाळे, अशोक आहिरे, प्रवीण पाटील, रवींद्र आभाळे, पंकज पाटील, विकास चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.