शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दुष्काळाची साडेसाती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:59 IST

पालक मंत्र्यांचा धावता आढावा; मंत्रीद्वयांकडून अपेक्षा

राजेंद्र शर्मा धुळे जिल्ह्याला जणू दुष्काळाची साडेसाती लागली आहे. कारण गेल्या सलग तीन वर्षापासून जिल्हा दुष्काळाला सामोरा जात आहे. जिल्ह्यात सरासरी ५३० मि.मी. पाऊस होतो. यावर्षी सरासरीपेक्षाही कमी केवळ ४०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ६७६ गावांपैकी १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. ही पैसेवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच तालुक्यातून त्याला विरोध झाला. आता ३१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याची अंतिम पीक पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यात यात निश्चित बदल होईल, अशी अपेक्षा आहे.  मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यांचा समावेश  आहे.साक्री तालुक्याचा मात्र समावेश नाही. पण साक्री तालुक्याची परिस्थितीही खूपच बिकट आहे. तालुक्यातील माळमाथा आणि काटवानसह सर्वच परिसरात भीषण दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे साक्री तालुक्याचाही समावेश करावा, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे. काँग्रेस, शिवसेनेतर्फे निवेदनेही देण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे.भर पावसाळ्यात सुद्धा जिल्ह्यात आठ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. धुळे, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातील विहिरींनी आतापासूनच तळ गाठले आहे. आतापासूनच काही गावांमध्ये आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. संपूर्ण पावसाळयात टँकर सुरुच होते आणि आता हिवाळ्यातही सुरुच राहणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात  येथील परिस्थिती काय असेल, याची कल्पना करणे कठीण आहे. उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत साठलेल्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन काटेकारेपणे करणे आवश्यक आहे. याशिवाय दुष्काळाच्या झळा सोसणा-या बळीराजाला शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे. कारण गेल्या वेळेस जाहीर केलेली दुष्काळी मदत अद्याप काही शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यात आता खरीप हंगामास फटका बसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. पालक मंत्र्यांचा धावता आढावा - जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवडयात पालकमंत्री दादा भुसे यांनी एक दिवसाचा धावता दौरा केला. या दौ-यात त्यांनी धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना आणि काही शेतक-यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. पाहणीनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालक मंत्र्यांनी पाणी वाटपाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे तसेच जिल्हा प्रशासनाला त्याचा कृति आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.मंत्रीद्वयांकडून अपेक्षा - पालक मंत्र्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनीही धुळे तालुक्याची पाहणी केली. त्यांनी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत आणण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे जिल्ह्यातील राज्यातील रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनीही राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दोघा मंत्र्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न केले पाहीजे. सर्वांनी तसे प्रामाणिकपणे एकत्रितरित्या प्रयत्न केले तर त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतक-यांना मिळेल. जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेतेमंडळींनीही मंत्र्यांसोबत दुष्काळाच्या प्रश्नावर एकत्र आले पाहिजे. दुष्काळाचे केवळ राजकारण आणि श्रेयाचा वाद निर्माण होता कामा नये. अन्यथा जिल्ह्यातील नेतेमंडळीच्या या घाणेरडया राजकारणाचा फटका नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी व जनतेला सोसावा लागेल. यंदातरी दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर जिल्ह्यातील नेतेमंडळी एकत्र येतील, अशी माफक अपेक्षा धुळेकरांची आहे.

टॅग्स :Dhuleधुळे