शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची साडेसाती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:59 IST

पालक मंत्र्यांचा धावता आढावा; मंत्रीद्वयांकडून अपेक्षा

राजेंद्र शर्मा धुळे जिल्ह्याला जणू दुष्काळाची साडेसाती लागली आहे. कारण गेल्या सलग तीन वर्षापासून जिल्हा दुष्काळाला सामोरा जात आहे. जिल्ह्यात सरासरी ५३० मि.मी. पाऊस होतो. यावर्षी सरासरीपेक्षाही कमी केवळ ४०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ६७६ गावांपैकी १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. ही पैसेवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच तालुक्यातून त्याला विरोध झाला. आता ३१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याची अंतिम पीक पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यात यात निश्चित बदल होईल, अशी अपेक्षा आहे.  मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यांचा समावेश  आहे.साक्री तालुक्याचा मात्र समावेश नाही. पण साक्री तालुक्याची परिस्थितीही खूपच बिकट आहे. तालुक्यातील माळमाथा आणि काटवानसह सर्वच परिसरात भीषण दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे साक्री तालुक्याचाही समावेश करावा, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे. काँग्रेस, शिवसेनेतर्फे निवेदनेही देण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे.भर पावसाळ्यात सुद्धा जिल्ह्यात आठ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. धुळे, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातील विहिरींनी आतापासूनच तळ गाठले आहे. आतापासूनच काही गावांमध्ये आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. संपूर्ण पावसाळयात टँकर सुरुच होते आणि आता हिवाळ्यातही सुरुच राहणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात  येथील परिस्थिती काय असेल, याची कल्पना करणे कठीण आहे. उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत साठलेल्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन काटेकारेपणे करणे आवश्यक आहे. याशिवाय दुष्काळाच्या झळा सोसणा-या बळीराजाला शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे. कारण गेल्या वेळेस जाहीर केलेली दुष्काळी मदत अद्याप काही शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यात आता खरीप हंगामास फटका बसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. पालक मंत्र्यांचा धावता आढावा - जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवडयात पालकमंत्री दादा भुसे यांनी एक दिवसाचा धावता दौरा केला. या दौ-यात त्यांनी धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना आणि काही शेतक-यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. पाहणीनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालक मंत्र्यांनी पाणी वाटपाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे तसेच जिल्हा प्रशासनाला त्याचा कृति आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.मंत्रीद्वयांकडून अपेक्षा - पालक मंत्र्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनीही धुळे तालुक्याची पाहणी केली. त्यांनी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत आणण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे जिल्ह्यातील राज्यातील रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनीही राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दोघा मंत्र्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न केले पाहीजे. सर्वांनी तसे प्रामाणिकपणे एकत्रितरित्या प्रयत्न केले तर त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतक-यांना मिळेल. जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेतेमंडळींनीही मंत्र्यांसोबत दुष्काळाच्या प्रश्नावर एकत्र आले पाहिजे. दुष्काळाचे केवळ राजकारण आणि श्रेयाचा वाद निर्माण होता कामा नये. अन्यथा जिल्ह्यातील नेतेमंडळीच्या या घाणेरडया राजकारणाचा फटका नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी व जनतेला सोसावा लागेल. यंदातरी दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर जिल्ह्यातील नेतेमंडळी एकत्र येतील, अशी माफक अपेक्षा धुळेकरांची आहे.

टॅग्स :Dhuleधुळे