शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

धुळे जिल्ह्यात पावसामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:00 IST

अद्याप खरिपाची पिके पूर्णपणे काढली नाही, जमिनीत ओलावा असल्याने मशागतही होऊ शकत नाही

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात यावर्षी होत असलेल्या परतीच्या पावसामुळे रब्बी क्षेत्राच्या पेरण्यांना अद्याप सुरूवात होऊ शकलेली नाही. खरीपाच्या पिकांची काढणी झाल्यानंतर २५ नोव्हेंबरपासून पेरण्यांना सुरूवात होऊ शकेल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान पावसामुळे रब्बीचे क्षेत्र दुप्पट वाढणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.यावर्षी जून महिना वगळता पावसाळ्याच्या सर्वच नक्षत्रांमध्ये दमदार पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. सुरूवातीला उत्पन्नही चांगले होते. ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपला तरी संपूर्ण आॅक्टोबर महिना अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे नुकसान तर झालेच, मात्र शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. कडक उन्हच पडत नसल्याने, शेतात वाफही होऊ शकली नाही. काही ठिकाणी तर पिकांपेक्षा तणच अधिक वाढलेले आहे.जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात मुख्यत: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, मका, रब्बी सूर्यफूल य यांचे पिक घेतले जात असते. या पिकांची पेरणी प्रामुख्याने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने, शेतात ओलावा कायम आहे. अजून खरिपाची पीके शेतात उभी आहेत. पावसामुळे पिकांची कापणीही होऊ शकत नाही. या पिकांची कापणी झाल्यानंतरच रब्बीसाठी शेतकऱ्यांना शेताची मशागत करता येणार आहे. त्यानंतर रब्बीच्या पेरण्या सुरू होतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे. जोपर्यंत शेतातील पाणी पूर्णपणे आटत नाही, तोपर्यंत शेतीची कामे करता येणे शक्यच नाही.जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या होण्याला नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उगविण्याची शक्यता आहे. या पेरण्या किमान डिसेंबर अखेरपर्यंत होवू शकतील. पावसामुळे यावर्षी रब्बीच्या पेरण्यांना किमान तीन आठवड्यांचा उशिर झालेला आहे.बियाण्यांची उपलब्धतायावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढण्याचे गृहीत धरून कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले असून, बियाणे उपलब्ध झालेले आहे. तसेच खतेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. आता फक्त पावसाने उघडीप घेण्याची प्रतीक्षा केली जात असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान खरीपात अ‍ेपक्षित उत्पन्न हाती न आल्याने, अनेक शेतकऱ्यांकडे रब्बीच्या लागवडीसाठी पैसा नाही. त्यामुळे अशा शेतकºयांना कर्ज काढूनच रब्बीची पेरणी करावी लागणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती