शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

धुळे जिल्ह्यात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:31 IST

खरिप हंगाम : जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्यापूर्ण, पावसाने दडी मारल्याने पीके कोमेजू लागली

ठळक मुद्देजिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्टजिल्हयात सर्वात कमी साक्री तालुक्यात पेरणीशेतकºयांचे डोळे लागले आभाळाकडे

अतुल जोशीआॅनलाइन लोकमतधुळे : रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्रात पाऊस झाला. जिल्ह्यात धुळे तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती बऱ्यापैकी आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. मात्र पावसाचे आगमन अतिशय उशिराने झाल्याने, मूग, उडीद पिकांचे अपेक्षित उत्पन्न येणे कठीण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून,पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जून महिना त्याचबरोबर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.कृषी विभागाने २०१९-२० या खरीप हंगामात जवळपास ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट प्रस्तावित केले आहे. यात २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड प्रस्तावित असून, उर्वरित १ लाख ८३ ८०० हेक्टर क्षेत्रावर मूग, उडीद, तूर, मका, नागली, भात आदी पिकांची लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.सुरूवात केलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.जिल्ह्यात ज्वारी ७ हजार ४३२ हेक्टर, बाजरी १६ हजार ६८९ हेक्टर, मका ४० हजार ८७३ हेक्टर, इतर तृणधान्याची ३७४ हेक्टर अशी ६५ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची लागवड झालेली आहे. तर तुरीची लागवड २३२० हेक्टर, मुग १० हजार ६५७, उडीद २ हजार ७९७, इतर कडधान्य १७३ हेक्टर अशी १५ हजार १४७ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड करण्यात आलेली आहे.याशिवाय भुईमुगाची ३ हजार ८४१ हेक्टर, तीळ २६५ हेक्टर, सोयाबीन १४ हजार ३९२ हेक्टर, इतर गळीत धान्य ३१६ हेक्टर अशी १८ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची लागवड झालेली आहे. शेतकºयांचे पांढरे सोने समजल्या जाणाºया कपाशीची सर्वाधिक लागवड करण्यात आलेली आहे. १५ जुलैपर्यंत १ लाख ७८ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झालेली आहे. तर उसाची १२७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. आतापर्यंत २ लाख ७९ हजार ५३३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. सर्वात कमी पेरणी साक्री तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात १ लाख ४ हजार ४३ पैकी अवघ्या ४८ हजार ८६८ हेक्टर (४६.९७) क्षेत्रावर पीकाची लागवड झालेली आहे. तर सर्वात जास्त पेरणी शिरपूर तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात १ लाख २७ हजार ३९६ पैकी ८७ हजार ५६६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. धुळे तालुक्यात ५२.९४ तर शिंदखेडा तालुक्यात ५८.०१ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. अजुनही खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या एक-दोन आठवड्यात पाऊस झाला नाही तर ज्या पिकांची उगवण झालेली आहे, त्यांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? असा प्रश्न आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे. पावसासाठी आता अनेकजण देवाला साकडे घालीत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे