शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

धुळे जिल्ह्यात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:31 IST

खरिप हंगाम : जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्यापूर्ण, पावसाने दडी मारल्याने पीके कोमेजू लागली

ठळक मुद्देजिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्टजिल्हयात सर्वात कमी साक्री तालुक्यात पेरणीशेतकºयांचे डोळे लागले आभाळाकडे

अतुल जोशीआॅनलाइन लोकमतधुळे : रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्रात पाऊस झाला. जिल्ह्यात धुळे तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती बऱ्यापैकी आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. मात्र पावसाचे आगमन अतिशय उशिराने झाल्याने, मूग, उडीद पिकांचे अपेक्षित उत्पन्न येणे कठीण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून,पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जून महिना त्याचबरोबर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.कृषी विभागाने २०१९-२० या खरीप हंगामात जवळपास ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट प्रस्तावित केले आहे. यात २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड प्रस्तावित असून, उर्वरित १ लाख ८३ ८०० हेक्टर क्षेत्रावर मूग, उडीद, तूर, मका, नागली, भात आदी पिकांची लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.सुरूवात केलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.जिल्ह्यात ज्वारी ७ हजार ४३२ हेक्टर, बाजरी १६ हजार ६८९ हेक्टर, मका ४० हजार ८७३ हेक्टर, इतर तृणधान्याची ३७४ हेक्टर अशी ६५ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची लागवड झालेली आहे. तर तुरीची लागवड २३२० हेक्टर, मुग १० हजार ६५७, उडीद २ हजार ७९७, इतर कडधान्य १७३ हेक्टर अशी १५ हजार १४७ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड करण्यात आलेली आहे.याशिवाय भुईमुगाची ३ हजार ८४१ हेक्टर, तीळ २६५ हेक्टर, सोयाबीन १४ हजार ३९२ हेक्टर, इतर गळीत धान्य ३१६ हेक्टर अशी १८ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची लागवड झालेली आहे. शेतकºयांचे पांढरे सोने समजल्या जाणाºया कपाशीची सर्वाधिक लागवड करण्यात आलेली आहे. १५ जुलैपर्यंत १ लाख ७८ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झालेली आहे. तर उसाची १२७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. आतापर्यंत २ लाख ७९ हजार ५३३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. सर्वात कमी पेरणी साक्री तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात १ लाख ४ हजार ४३ पैकी अवघ्या ४८ हजार ८६८ हेक्टर (४६.९७) क्षेत्रावर पीकाची लागवड झालेली आहे. तर सर्वात जास्त पेरणी शिरपूर तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात १ लाख २७ हजार ३९६ पैकी ८७ हजार ५६६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. धुळे तालुक्यात ५२.९४ तर शिंदखेडा तालुक्यात ५८.०१ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. अजुनही खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या एक-दोन आठवड्यात पाऊस झाला नाही तर ज्या पिकांची उगवण झालेली आहे, त्यांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? असा प्रश्न आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे. पावसासाठी आता अनेकजण देवाला साकडे घालीत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे