शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

धुळे जिल्ह्यात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:31 IST

खरिप हंगाम : जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्यापूर्ण, पावसाने दडी मारल्याने पीके कोमेजू लागली

ठळक मुद्देजिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्टजिल्हयात सर्वात कमी साक्री तालुक्यात पेरणीशेतकºयांचे डोळे लागले आभाळाकडे

अतुल जोशीआॅनलाइन लोकमतधुळे : रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्रात पाऊस झाला. जिल्ह्यात धुळे तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती बऱ्यापैकी आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. मात्र पावसाचे आगमन अतिशय उशिराने झाल्याने, मूग, उडीद पिकांचे अपेक्षित उत्पन्न येणे कठीण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून,पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जून महिना त्याचबरोबर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.कृषी विभागाने २०१९-२० या खरीप हंगामात जवळपास ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट प्रस्तावित केले आहे. यात २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड प्रस्तावित असून, उर्वरित १ लाख ८३ ८०० हेक्टर क्षेत्रावर मूग, उडीद, तूर, मका, नागली, भात आदी पिकांची लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.सुरूवात केलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.जिल्ह्यात ज्वारी ७ हजार ४३२ हेक्टर, बाजरी १६ हजार ६८९ हेक्टर, मका ४० हजार ८७३ हेक्टर, इतर तृणधान्याची ३७४ हेक्टर अशी ६५ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची लागवड झालेली आहे. तर तुरीची लागवड २३२० हेक्टर, मुग १० हजार ६५७, उडीद २ हजार ७९७, इतर कडधान्य १७३ हेक्टर अशी १५ हजार १४७ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड करण्यात आलेली आहे.याशिवाय भुईमुगाची ३ हजार ८४१ हेक्टर, तीळ २६५ हेक्टर, सोयाबीन १४ हजार ३९२ हेक्टर, इतर गळीत धान्य ३१६ हेक्टर अशी १८ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची लागवड झालेली आहे. शेतकºयांचे पांढरे सोने समजल्या जाणाºया कपाशीची सर्वाधिक लागवड करण्यात आलेली आहे. १५ जुलैपर्यंत १ लाख ७८ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झालेली आहे. तर उसाची १२७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. आतापर्यंत २ लाख ७९ हजार ५३३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. सर्वात कमी पेरणी साक्री तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात १ लाख ४ हजार ४३ पैकी अवघ्या ४८ हजार ८६८ हेक्टर (४६.९७) क्षेत्रावर पीकाची लागवड झालेली आहे. तर सर्वात जास्त पेरणी शिरपूर तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात १ लाख २७ हजार ३९६ पैकी ८७ हजार ५६६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. धुळे तालुक्यात ५२.९४ तर शिंदखेडा तालुक्यात ५८.०१ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. अजुनही खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या एक-दोन आठवड्यात पाऊस झाला नाही तर ज्या पिकांची उगवण झालेली आहे, त्यांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? असा प्रश्न आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे. पावसासाठी आता अनेकजण देवाला साकडे घालीत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे